शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कुंभमेळयाला नियमानुसार तिकीट दराची आकारणी; मग साहित्य संमेलनाला सापत्न वागणूक का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:25 IST

एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला; मात्र मायमराठीच्या उत्सवाला मिळणाऱ्या या सापत्न वागणुकीमुळे काहीसे नाराजीचे वातावरण

पुणे: राजधानी दिल्लीमध्ये ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा रंगणार असताना संमेलनापूर्वीच काहीसा नाराजीचा सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. कुंभमेळा व सणासुदीच्या वेळी रेल्वे बोर्डाकडून जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येतात आणि नियमानुसार तिकीट दर आकारले जातात . मग साहित्य संमेलनासाठी पुण्यातून सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेसाठी ज्यादा दराने आकारणी का? असा सवाल साहित्य क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला; मात्र मायमराठीच्या उत्सवाला मिळणाऱ्या या सापत्न वागणुकीमुळे काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दांतून व्यक्त झाली आणि जणू ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. या मायमराठीचा कौतुक सोहळा वर्षानुवर्षे भारतातील अनेक प्रांतात अभिमानाने साजरा केला जातो. संमेलन हा त्याचाच एक अंश. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत होत आहे. मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्यात आल्याने एकीकडे मराठी जनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालयाकडून दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेसाठी तिप्पट दर आकारले जात असल्याच्या संयोजकांच्या सांगण्याने आनंदात काहीसे विरजण पडले आहे. ही विशेष रेल्वे गाडी फुल्ल ट्रॅफिक रेट (एफटीआर) या नियमानुसार बुक करण्यात आली असून, ही रेल्वे एफटीआर योजनेमध्ये असल्याने तिप्पट तिकीट दर आकारणी करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र त्या अतिरिक्त तिकिटाचा भार संयोजकांवर पडणार आहे. यामुळे साहित्य क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटला आहे. इतर वेळी रेल्वे बोर्डाकडून सण, उत्सव, अयोध्यावारी यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येतात. मग साहित्य संमेलनाला ही दुय्यम वागणूक का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

घुमानला होती फ्री रेल्वे

सन २०१४ मध्ये मराठी साहित्य संमेलन पंजाब राज्यातील घुमान येथे झाले होते. दरम्यान, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुणे आणि नाशिकमधून साहित्य आणि रसिकांसाठी मोफत रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

साहित्य संमेलनाला मराठी साहित्यिक आणि रसिकाला दिल्लीला जाण्यासाठी फुल्ल ट्रॅफिक रेट (एफटीआर) या योजनेमध्ये रेल्वे बुक करण्यात आली आहे. यामध्ये स्लीपर गाडी असून, पॅन्ट्री कारसह १८ डब्यांची गाडी आहे. रसिकांच्या सोयीसाठी संयोजकांकडून तिकिटाव्यतिरिक्त इतर खर्चापोटी रेल्वेचा होणारा जादा खर्च भरण्यात येणार आहे. -संजय नहार, संयोजक, ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळpassengerप्रवासीKumbh Melaकुंभ मेळाticketतिकिट