शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

बंधाऱ्यावर म्हशींना घेऊन गेले अन् परतलेच नाहीत; शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 17:54 IST

दोन दिवसांनी शेतकऱ्याचा मृतदेह बंधाऱ्याजवळ आढळून आला

नसरापूर : कुरंगवडी (ता.भोर) येथील शेतकरी गोठ्यातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी बंधाऱ्यावर घेऊन गेला असताना पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना येथे नुकतीच घडली. राजगड पोलिस ठाण्यात माहीती दिल्यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणुन नोंद केली आहे. शंकर विठोबा कचरे (वय ५४ वर्षे रा.कुरंगवडी ता.भोर) यांचा या शेतकऱ्याचा दुर्दैवी घटनेत पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे. याबाबत पोलिस पाटील नरेश शिळीमकर यांनी राजगड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. 

गेल्या मंगळवारी ( दि.१६) रोजी शेतकरी शंकर कचरे हे नेहमी प्रमाणे दुपारी त्यांच्या गोठ्यातील दहा ते बारा म्हशी घेऊन सांगवी-घोरेपडळ गावा जवळील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावर घेऊन गेले होते. त्यानंतर संध्याकाळी या म्हशी घरी परत गेल्या, परंतु त्यांचे सोबत गेलेले कचरे पुन्हा घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी कचरे यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र कचरे सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा घरातील सर्व जण कचरे यांच्या शोधासाठी पुन्हा घरा बाहेर पडले. तेंव्हा त्यांना सांगवी-घोरेपडळ येथील बंधाऱ्या लगत कचरे यांचे कपडे व चप्पल मिळून आली. त्यावेळी त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यातील पाण्यातही शोध घेतला असता त्यात शंकर कचरे असता त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत अनिल शंकर कचरे (वय २७ वर्षे) यांनी नसरापूर येथील राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली असुन पुढील तपास पोलिस हवालदार गणेश कुदळे करीत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSocialसामाजिकDeathमृत्यूWaterपाणी