शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

बंधाऱ्यावर म्हशींना घेऊन गेले अन् परतलेच नाहीत; शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 17:54 IST

दोन दिवसांनी शेतकऱ्याचा मृतदेह बंधाऱ्याजवळ आढळून आला

नसरापूर : कुरंगवडी (ता.भोर) येथील शेतकरी गोठ्यातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी बंधाऱ्यावर घेऊन गेला असताना पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना येथे नुकतीच घडली. राजगड पोलिस ठाण्यात माहीती दिल्यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणुन नोंद केली आहे. शंकर विठोबा कचरे (वय ५४ वर्षे रा.कुरंगवडी ता.भोर) यांचा या शेतकऱ्याचा दुर्दैवी घटनेत पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे. याबाबत पोलिस पाटील नरेश शिळीमकर यांनी राजगड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. 

गेल्या मंगळवारी ( दि.१६) रोजी शेतकरी शंकर कचरे हे नेहमी प्रमाणे दुपारी त्यांच्या गोठ्यातील दहा ते बारा म्हशी घेऊन सांगवी-घोरेपडळ गावा जवळील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावर घेऊन गेले होते. त्यानंतर संध्याकाळी या म्हशी घरी परत गेल्या, परंतु त्यांचे सोबत गेलेले कचरे पुन्हा घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी कचरे यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र कचरे सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा घरातील सर्व जण कचरे यांच्या शोधासाठी पुन्हा घरा बाहेर पडले. तेंव्हा त्यांना सांगवी-घोरेपडळ येथील बंधाऱ्या लगत कचरे यांचे कपडे व चप्पल मिळून आली. त्यावेळी त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यातील पाण्यातही शोध घेतला असता त्यात शंकर कचरे असता त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत अनिल शंकर कचरे (वय २७ वर्षे) यांनी नसरापूर येथील राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली असुन पुढील तपास पोलिस हवालदार गणेश कुदळे करीत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSocialसामाजिकDeathमृत्यूWaterपाणी