‘माळेगाव’ ची निवडणूक स्थानिक;यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती- शरद पवार यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:47 IST2025-06-18T15:44:55+5:302025-06-18T15:47:08+5:30

या घडामोडींवर ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे.

There was no need to take an extreme stance in the local election of Malegaon Sharad Pawar opinion | ‘माळेगाव’ ची निवडणूक स्थानिक;यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती- शरद पवार यांचे मत

‘माळेगाव’ ची निवडणूक स्थानिक;यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती- शरद पवार यांचे मत

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगांव निवडणुकीच्या आखाड्यात स्वत: उतरत ‘ब’ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.शिवाय आगामी पाच वर्ष कारखान्याचे चेअरमन म्हणुन देखील उपमुख्यमंत्री यांनी स्वत:च्याच नावाची घोषणा केली आहे.त्यामुळे माळेगांव कारखान्याची निवडणुक लक्षवेधी ठरली आहे.या घडामोडींवर ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ नेते पवार यांनी आगामी दोन दिवसांत बारामती परीसरात विविध कार्यक्रम आहेत. या पार्श्वभुमीवर पवार हे बारामती दाैर्यावर आहेत.बुधवारी(दि १८) माळेगांव येथील गोविंदबाग निवासस`थानी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी उपमुख्यमंत्री पवार यांंच्या स्वत: उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या भुमिकेवर हे मत व्यक्त केले आहे.पवार म्हणाले, 'या निवडणुकीकडे राज्याकडं राज्याचे लक्ष लागलं आहे असं कसे म्हणता येईल? हा स्थानिक प्रश्न आहे." याचा अर्थ, ही निवडणूक फक्त स्थानिक पातळीवरची आहे.

याकडे राज्याने लक्ष देण्याची गरज नाही. आजू बाजूला जे तालुके आहेत त्यांचे लक्ष इथे नाही. या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती आजही नाही. म्हणजे, आसपासच्या तालुक्यांचेही या निवडणुकीकडे लक्ष नाही.एक विशिष्ट स्थिती झाली. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं. आजचा १९००० सभासदांचा प्रश्न आहे," असे पवार म्हणाले. याचा अर्थ, लोकांना सोबत घेतले असते, तर वेगळी परिस्थिती असती. आता १९ हजार सभासदांचा प्रश्न आहे. बारामतीमध्ये सूतगिरणी का झाली नाही, याबद्दल बोलताना ते म्हणाले, "बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता परंतु आता कापूस इथे राहिला नाही." म्हणजे, पूर्वी बारामती कापसासाठी ओळखली जात होती, पण आता तिथे कापूस नसल्याचे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अेआयच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने काल ५०० कोटीचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि बाकीचे पिके वापरण्याचे धोरण फायनल केलं. हा फायद्याचे असेल म्हणून निर्णय घेतला. तसेच,देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. त्यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. देशात पहिलं राज्य आहे की एआय स्वीकारत आहे, त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो,अशा शब्दात पवार यांनी सरकारचे काैतुक  केले.

Web Title: There was no need to take an extreme stance in the local election of Malegaon Sharad Pawar opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.