शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

...तर भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणीही हिंमत करणार नाही - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:13 IST

थोरले बाजीराव हे एकमेव सरसेनापती आहेत, ते एकही युद्ध हरले नाहीत

पुणे : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी शाह यांनी  थोरले बाजीरावांच्या पराक्रमाचा लेखाजोगा आपल्या भाषणातून मांडला आहे. 17 व्या शतकात पुण्यातून स्वराज्याचा आलेख, तंजावूरपासून अटक ते अटक पासून कटक पर्यंत आला असे त्यांनी यावेळी  सांगितले आहे. त्यांचा पराक्रमाचा अभ्यास केल्यास भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणीही हिंमत करणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

शाह म्हणाले,  आता मी पुण्यात उभा आहे. सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळरात्री आशेचा किरण दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो. पुण्याची भूमी एक प्रकारे स्वराज्याच्या संस्काराची उगमस्थान आहे. १७ व्या शतकात या ठिकाणाहून स्वराज्याचा आलेख, तंजावूरपासून अटक ते अटक पासून कटक पर्यंत आला” असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

२० वर्षात ४१ युद्ध लढले आणि ते सर्व जिंकले

थोरले बाजीराव पेशवे हे २० वर्षात ४१ युद्ध लढले आणि ते सर्व जिंकले. अशा वीर योद्धा चा पुतळा आज एनडिएत उभारला गेलाय याचा अभिमान वाटतो. इंग्रजांच्यासमोर स्वराज्यासाठी लढण्याची वेळ आली, तेव्हा सर्वात आधी सिंहगर्जना टिळकांनी केली. वीर सावरकरांनी महाराष्ट्राच्या भूमीतून उदहारण घालून दिले. एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो हे सावरकरांनी दाखवलं. एनडीएची मूळ स्थापना झाली असेल, तेव्हा काय विचार केला असेल. तेव्हा वातावरण चांगलं होतं. म्हणून एनडीए बनवली आहे. पण इंग्रजांना माहीत नाही की या ठिकाणी येणारं शतकभर भारताच्या सुरक्षेचं स्थान होईल असं अमित शाह म्हणाले.

बाजीराव एकही युद्ध हरले नाहीत 

बाजीरावांचे पुतळे आपल्या संपूर्ण देशात आहेत. पण स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीएच आहे. श्रीमंत बाजीरावांच्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. त्यांच्या रणनितीचा आपण उपयोग केल्यास मला वाटतं अनेक वर्ष भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंमत करणार नाही. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांची निवड केली. ते एकही युद्ध हरले नाहीत. हा रेकॉर्ड कोणत्याच सेनापतीचा नाही. एका वर्षात दोन युद्ध होतात. त्याकाळी पावसाळ्यात चार महिने युद्ध होत नव्हती. म्हणजे 8 महिन्यात दोन युद्ध करून जिंकले. असे वीर सेनानी होते ते” अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याच कौतुक केलं. “शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना केली असेल तेव्हा भारताचा भूगोल. त्यावेळचा भारताच्या साम्राज्याचा इतिहास पाहिल्यावर १२ वर्षाच्या मुलाने काय विचार केला असेल याचा विचार करा” असं अमित शाह म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAmit Shahअमित शाहBJPभाजपाMahayutiमहायुतीPoliticsराजकारणPeshwaiपेशवाई