...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:53 IST2025-06-25T10:52:26+5:302025-06-25T10:53:51+5:30

'कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं', उद्धव ठाकरे गटाकडून बॅनरबाजी

...then Budhwar Peth should be renamed Mastani Peth BJP Uddhav Thackeray group face to face on medha Kulkarni demand | ...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने

...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून भाजप - उद्धव ठाकरे गट आमनेसामने

पुणे : पुण्याला बाजीराव पेशव्यांसारखा इतिहासातील महान सेनानी लाभलेला असून, त्यांच्या कार्याला गौरवण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. संभाजी ब्रिगेडने या मागणीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने मेधा कुलकर्णी यांचा बॅनरच्या माध्यमातून समाचार घेतल्याचे दिसून आले आहे. 

पुणे शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत. ''कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं'', असा मजकूर या बॅनरवर देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या या मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आलाय, ही मागणी करणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका करण्यात आली. या मागणीच्या निमित्ताने पुण्यात भाजप आणि ठाकरे सेना आम्ही सामने आल्याचे पाहायला मिळालं आहे. 

नेमकं काय म्हणाल्या कुलकर्णी? 

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे.. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे.. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केले आहे.. या कामात बाजीराव पेशवे यांची देखील योगदान मोठे आहे.. थोरली बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही.. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात.. त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात.. छत्रपती शिवरायांचा वारसा यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा कुरली बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

कुलकर्णी यांची मागणी अत्यंत चुकीची

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. पुणे शहर वसवले. त्यांनी जर हे केले नसते तर पुण्याची निर्मिती झाली असती का. तर पेशवे वगैरे शौर्य गाजवू शकले असते का? पेशव्यांसारखे सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मुळे तयार झाले आहेत. आपण लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्य चालू शकतो ही भावना राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केली आहे. त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचेच नाव दिले पाहिजे. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे.. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीचा आम्ही जाहीर निषेध करतो असे श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले आहे. 

Web Title: ...then Budhwar Peth should be renamed Mastani Peth BJP Uddhav Thackeray group face to face on medha Kulkarni demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.