शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत पावसाने झालेली दुर्दशा सरकारसाठी लाजीरवाणी; पुण्यातून काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:21 IST

महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही भरीव काम करू शकलेले नाहीत

पुणे : आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथील रस्ते जलमय होऊन उडालेली दैना राज्यातील भाजप सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्याचे धोरण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आखले होते. त्यातूनच हैदराबाद, पुणे, बंगळुरू येथे आयटी पार्क विकसित झाले. हिंजवडीतील प्रकल्पाला उत्तेजन देऊन अधिकाधिक उद्योजक पुण्याकडे यावेत, याकरिता ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांनी अथक प्रयत्न केले. केंद्र आणि राज्यात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यानंतर पुण्यातील आयटी क्षेत्राला गती मिळण्याऐवजी ब्रेक लागला आहे.

हिंजवडीमधील आयटी पार्कमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणे, त्यांना मूलभूत नागरी सुविधा पुरविणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. पण त्यात कुचराई होत असल्याने अनेक उद्योग पुण्यातून बाहेर जात आहेत. महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही भरीव काम करू शकलेले नाहीत. विद्यापीठ रस्त्यावरील उड्डाणपूल तातडीने उभा करण्यात पालकमंत्र्यांना अपयश आले आहे. यामुळे औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी या भागातील रहिवाशांची वाहतुकीसाठी गैरसोय होत आहे. परंतु, सरकारला त्याची फिकीर नाही. कामाऐवजी भूमिपूजन आणि एकाच प्रकल्पाची वारंवार उद्घाटने करणे यातच भाजप नेते रमले आहेत, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRainपाऊसweatherहवामान अंदाजMahayutiमहायुती