शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

Prakash Ambedkar: महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबर नकोच आहोत; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

By राजू इनामदार | Updated: September 23, 2024 17:12 IST

लोकसभा निवडणुकीच्या किमान ८ महिने आधीच मी सांगितले होते की आम्हाला बरोबर घ्या, २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, मात्र त्यांनी सगळा वेळ चर्चेतच घालवला

पुणे: लोकसभा निवडणुकीतच माझ्या लक्षात आले की महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबरच नकोच आहोत. लोकसभा निवडणुकीतच हे आमच्या लक्षात आले. त्यामुळेच आता आदिवासी, ओबीसी संघटनांना बरोबर घेत आम्ही विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढणार आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ॲड. आंबेडकर तसेच नागपूरचे प्रा. अनिकेत मून यांनी न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. त्याची माहिती देण्यासाठी ॲड. आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आरक्षण व अन्य विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या किमान ८ महिने आधीच मी सांगितले होते की आम्हाला बरोबर घ्या, २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, मात्र त्यांनी सगळा वेळ चर्चेतच घालवला. त्यावेळीच आमच्या लक्षात आले की यांना आम्हाला बरोबर घ्यायचेच नाही तर केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून स्वत:चा अजेंडा राबवायचा आहे.

आरक्षण राज्यघटनेने दिले आहे. त्यासंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला आहे. आरक्षण हा विकासाचा मुद्दा नाही तर प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रतिनिधित्व मिळण्यालाचा बाधा येत आहे. त्यामुळेच आम्ही या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यघटनेनेच अनेक समाज घटकांना व्यवस्थेत आणले आहे. आता ते या निर्णयाने बाहेर पडले तर प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून सगळा समाज आक्रमक होईल अशी भीती ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी त्याही वेळी असे म्हणालो होते की मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असावे, ओबीसींचे ताट वेगळे असावे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी म्हणून ज्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे, ते मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. आता आम्ही आदिवासी तसेच ओबीसी यांच्या संघटनांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. त्यातील काही जागाही जाहीर केल्या. या संघटनांनाच आम्ही त्यांनी त्यांच्या परिसराचा सर्व्हे करून जागा निश्चित कराव्यात, त्याची यादी आम्हाला द्यावी, त्या जागा आम्ही जाहीर करू असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

जरांगे पाटील, शरद पवार तसेच वंचित बहुजन आघाडी सध्याच्या तणावपूर्ण सामाजिक वातावरणाकडे कसे पाहते या प्रश्नांवर उत्तर देण्याचे ॲड. आंबेडकर यांनी टाळले. यावेळी माझा मुख्य विषय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाच होता. त्याचीच माहिती द्यायची होती असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद संपवली. वंचित बहुजनचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे तसेच वंचितचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी