शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Prakash Ambedkar: महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबर नकोच आहोत; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

By राजू इनामदार | Updated: September 23, 2024 17:12 IST

लोकसभा निवडणुकीच्या किमान ८ महिने आधीच मी सांगितले होते की आम्हाला बरोबर घ्या, २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, मात्र त्यांनी सगळा वेळ चर्चेतच घालवला

पुणे: लोकसभा निवडणुकीतच माझ्या लक्षात आले की महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबरच नकोच आहोत. लोकसभा निवडणुकीतच हे आमच्या लक्षात आले. त्यामुळेच आता आदिवासी, ओबीसी संघटनांना बरोबर घेत आम्ही विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढणार आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ॲड. आंबेडकर तसेच नागपूरचे प्रा. अनिकेत मून यांनी न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. त्याची माहिती देण्यासाठी ॲड. आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आरक्षण व अन्य विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या किमान ८ महिने आधीच मी सांगितले होते की आम्हाला बरोबर घ्या, २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, मात्र त्यांनी सगळा वेळ चर्चेतच घालवला. त्यावेळीच आमच्या लक्षात आले की यांना आम्हाला बरोबर घ्यायचेच नाही तर केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून स्वत:चा अजेंडा राबवायचा आहे.

आरक्षण राज्यघटनेने दिले आहे. त्यासंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला आहे. आरक्षण हा विकासाचा मुद्दा नाही तर प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रतिनिधित्व मिळण्यालाचा बाधा येत आहे. त्यामुळेच आम्ही या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यघटनेनेच अनेक समाज घटकांना व्यवस्थेत आणले आहे. आता ते या निर्णयाने बाहेर पडले तर प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून सगळा समाज आक्रमक होईल अशी भीती ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी त्याही वेळी असे म्हणालो होते की मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असावे, ओबीसींचे ताट वेगळे असावे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी म्हणून ज्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे, ते मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. आता आम्ही आदिवासी तसेच ओबीसी यांच्या संघटनांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. त्यातील काही जागाही जाहीर केल्या. या संघटनांनाच आम्ही त्यांनी त्यांच्या परिसराचा सर्व्हे करून जागा निश्चित कराव्यात, त्याची यादी आम्हाला द्यावी, त्या जागा आम्ही जाहीर करू असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

जरांगे पाटील, शरद पवार तसेच वंचित बहुजन आघाडी सध्याच्या तणावपूर्ण सामाजिक वातावरणाकडे कसे पाहते या प्रश्नांवर उत्तर देण्याचे ॲड. आंबेडकर यांनी टाळले. यावेळी माझा मुख्य विषय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाच होता. त्याचीच माहिती द्यायची होती असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद संपवली. वंचित बहुजनचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे तसेच वंचितचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी