शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Prakash Ambedkar: महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबर नकोच आहोत; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

By राजू इनामदार | Updated: September 23, 2024 17:12 IST

लोकसभा निवडणुकीच्या किमान ८ महिने आधीच मी सांगितले होते की आम्हाला बरोबर घ्या, २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, मात्र त्यांनी सगळा वेळ चर्चेतच घालवला

पुणे: लोकसभा निवडणुकीतच माझ्या लक्षात आले की महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबरच नकोच आहोत. लोकसभा निवडणुकीतच हे आमच्या लक्षात आले. त्यामुळेच आता आदिवासी, ओबीसी संघटनांना बरोबर घेत आम्ही विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढणार आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ॲड. आंबेडकर तसेच नागपूरचे प्रा. अनिकेत मून यांनी न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. त्याची माहिती देण्यासाठी ॲड. आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आरक्षण व अन्य विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या किमान ८ महिने आधीच मी सांगितले होते की आम्हाला बरोबर घ्या, २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, मात्र त्यांनी सगळा वेळ चर्चेतच घालवला. त्यावेळीच आमच्या लक्षात आले की यांना आम्हाला बरोबर घ्यायचेच नाही तर केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून स्वत:चा अजेंडा राबवायचा आहे.

आरक्षण राज्यघटनेने दिले आहे. त्यासंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला आहे. आरक्षण हा विकासाचा मुद्दा नाही तर प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रतिनिधित्व मिळण्यालाचा बाधा येत आहे. त्यामुळेच आम्ही या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यघटनेनेच अनेक समाज घटकांना व्यवस्थेत आणले आहे. आता ते या निर्णयाने बाहेर पडले तर प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून सगळा समाज आक्रमक होईल अशी भीती ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी त्याही वेळी असे म्हणालो होते की मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असावे, ओबीसींचे ताट वेगळे असावे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी म्हणून ज्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे, ते मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. आता आम्ही आदिवासी तसेच ओबीसी यांच्या संघटनांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. त्यातील काही जागाही जाहीर केल्या. या संघटनांनाच आम्ही त्यांनी त्यांच्या परिसराचा सर्व्हे करून जागा निश्चित कराव्यात, त्याची यादी आम्हाला द्यावी, त्या जागा आम्ही जाहीर करू असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

जरांगे पाटील, शरद पवार तसेच वंचित बहुजन आघाडी सध्याच्या तणावपूर्ण सामाजिक वातावरणाकडे कसे पाहते या प्रश्नांवर उत्तर देण्याचे ॲड. आंबेडकर यांनी टाळले. यावेळी माझा मुख्य विषय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाच होता. त्याचीच माहिती द्यायची होती असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद संपवली. वंचित बहुजनचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे तसेच वंचितचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी