शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हिंदीच्या सक्तीमागे हिंदी, हिंदू, हिंदुराष्ट्र असा विचार - हर्षवर्धन सपकाळ

By राजू इनामदार | Updated: April 19, 2025 20:36 IST

पाचवीनंतर इंग्रजी आवश्यक, हिंदी ऐच्छिक, त्यानंतर इयत्ता आठवीत संस्कृत; पण तेही ऐच्छिक असे आहे.

पुणे : हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे, यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू, हिंदुराष्ट्र, असा विचार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. इयत्ता पाचवीपासून हिंदी व पुढे तर संस्कृत व नंतर अन्य भाषांचा अभ्यास करता येत असतानाही ही सक्ती कशासाठी? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.

सपकाळ यांनी शनिवारी दुपारी लोकमत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी झालेल्या वार्तालापात त्यांनी शालेय अभ्यासक्रमात केंद्र सरकारने लागू केलेल्या व राज्य सरकारने स्वीकारलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला. सपकाळ म्हणाले, ‘सध्या इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय अभ्यासक्रमात आहेच. त्यानंतर इयत्ता आठवीपासून संस्कृत विषयही आहे. त्यापुढे अन्य भाषांचा, इतकेच काय; पण परदेशी भाषांचाही अभ्यास करता येतो. मग इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा सक्ती करण्याचे धोरण कशासाठी? असा प्रश्न आहे.’

सक्ती करणेच अशास्त्रीय आहे, हे स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले, ‘लहान मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी मुळात ० ते ६ वर्षांपर्यंत मुलांना कसलाही शालेय अभ्यास, परीक्षा देऊ नये, असे म्हटलेले आहे. असे असताना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मुलांना केजी, सिनिअर केजी करायला लावले जाते. हा निव्वळ व्यवसाय झाला आहे. मुलांच्या मेंदूचा विकास होण्यास, अभ्यास करण्याची क्षमता येण्यास वयाच्या ६ व्या वर्षानंतर समज येते. त्यानंतरच शालेय विषय सुरू व्हावेत, असे आहे. त्यात अशी सक्ती करणे व तीसुद्धा भाषा विषयाची, हे योग्य तर नाहीच, शिवाय अशास्त्रीयच आहे.’

आपल्या स्वत:च्या मुलांचे उदाहरण देत सपकाळ म्हणाले, ‘दोघेही साध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकले. पुढील शिक्षणात त्यांना कसलीही अडचण आली नाही. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे काम ते करू शकतात.’ हिंदी भाषेची सक्ती करण्याचा विचार तसाच पुढे आलेला नाही, तर त्यामागे हिंदी, हिंदू व हिंदुराष्ट्र, असा विचार असल्याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला. तीन भाषांचे सूत्र देशाने स्वीकारले आहे. मात्र, त्यात कुठेही सक्ती नाही. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण व पुढे इयत्ता पाचवीनंतर इंग्रजी आवश्यक, हिंदी ऐच्छिक, त्यानंतर इयत्ता आठवीत संस्कृत; पण तेही ऐच्छिक असे आहे. असे धोरण असताना आता त्यात हिंदी भाषेची सक्ती व तीसुद्धा इयत्ता पहिलीपासून यामागे तोच विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपा