शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

उन्हाचा चटका वाढला! पुण्यात पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता

By नितीन चौधरी | Updated: April 7, 2023 13:46 IST

शहरात तापमानाचा पारा चाळीसच्या आसपास

पुणे : सकाळी पावसाच्या हलक्या सरी, दुपारी उन्हाचा चटका अन् सायंकाळी पुन्हा हलक्या सरी असे विषम वातावरण गुरुवारी (दि. ६) शहरात होते. ढगाळ वातावरण असूनही शहराच्या पूर्व भागात तापमान चाळीशीत पोहोचले होते. येत्या दोन दिवसात शहरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा व हलक्या पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले.

पुढील चार दिवसांतही सायंकाळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शनिवारी विदर्भ व मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात उन्हाचा चटका वाढल्याचे जाणवत आहे. परिणामी वडगाव शेरी व कोरेगाव पार्क भागात तापमान चाळीशीला पोहोचले आहे.

कोरेगाव पार्क भागात बुधवारी कमाल तापमानाचा पारा ३९.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तर लवळे व वडगाव शेरीचे तापमान ३९ अंश सेल्सिअस होते तर शिरूरमध्ये तापमान ४०.२ अंशांवर पोहोचले होते. गुरुवारी त्या तुलनेत सकाळी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असतानाचा दुपारी सूर्य चांगलाच तळपला. शहराच्या पूर्व भागात पुन्हा तापमान चाळीशीपर्यंत पोहोचले. वडगाव शेरीत ३९.५ तर कोरेगाव पार्कात ३९.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. शहराच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला.

दुसरीकडे बुधवारी किमान तापमानातही वाढ झाल्याचे दिसून आले. शिवाजीनगरमध्ये १८.२ तर हडपसरमध्ये २३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गुरुवारीही वडगाव शेरीत किमान तापमान २५ अंशांवर पोहोचले होते. हडपसरमध्ये २४.३, तर लवळे येथे २४.४ इतके नोंदविण्यात आले. शिवाजीनगरमध्ये हेच तापमान १७.५ अंश सेल्सिअस होते.

पुढील दोन दिवस यलो अलर्ट 

हवेतील विसंगतीमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावरून राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. दिवसाचे तापमान वाढले असल्याने सायंकाळी ढगाळ वातावरणाचा अनुभव येत आहे. त्यामुळे हवामान विभागाने शहरासाठी पुढील दोन दिवसात ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह अति हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे चार दिवस आकाश सकाळी मुख्यत्वे निरभ्र राहून सायंकाळी अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात शनिवारी ऑरेंज अलर्ट 

राज्यात शुक्रवारी वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, ठाणे व रायगड वगळता अन्य जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. शनिवारी दक्षिण मराठवाड्याचे लातूर, धाराशिव व नांदेड वगळता राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ असेल. रविवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर व मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीडमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊसHealthआरोग्यenvironmentपर्यावरणSocialसामाजिक