शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Mahatma Gandhi Jayanti: गांधीजी-कस्तुरबांच्या सहजीवनाची हृद्य अखेर पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:51 IST

इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला, भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला, तेव्हा गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले

ऑगस्ट १९४२ मध्ये महात्मा गांधींना इंग्रज सरकारने आगाखान पॅलेसमध्ये आणले. कस्तुरबा गांधी त्यांच्यासमवेत होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाडाची काडे करणाऱ्या आपल्या थोर पतीचा दीर्घ सहवास या निमित्ताने प्रथमच कस्तुरबांना मिळाला. त्या समाधानातच बहुधा त्यांनी याच आगाखान पॅलेसमध्ये आपले डोळे मिटले. त्यावेळी हा थोर महात्मा बराच काळ उदास झाला होता.

महात्मा गांधी व कस्तुरबा यांचे सहजीवन आदर्श असेच होते. कस्तुरबांनी आपल्या जगावेगळ्या पतीचे मोठेपण मान्य करत त्यांच्या कार्यात स्वत:ला समर्पित केले होते; तर जगाला सत्याचे प्रयोग करून दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांनी आपल्या पत्नीच्या शब्दांना नेहमीच मान देत आदर केला. त्यांच्या या आदर्श सहजीवनाची अखेर पुण्यात झाली.

या पत्नी-पत्नींना इंग्रज सरकारने आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या या सहजीवनाचा अल्पकाळ का होईना, आगाखान पॅलेस साक्षीदार झाला, मात्र कस्तुरबांचे निधन आपल्याच आवारात होईल व या सहजीवनाची अखेर आपल्याला पाहावी लागेल, अशी कल्पनाही पॅलेसने केली नसेल.

मात्र तसेच झाले. इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला. भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला. देशभर चळवळ सुरू झाली. इंग्रजांनी सर्व नेत्यांना अटक केली. गांधी वगळता सर्व नेत्यांनी त्यांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात पाठवले. महात्मा गांधींना मात्र पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले. कस्तुरबांना त्यांच्यासमवेत देण्यात आले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना या पॅलेसमध्ये आणले गेले. त्यांच्यावर इंग्रज पोलिसांची सक्त नजर होती. त्यांना त्यांचे दैनंदिन काम करण्यात कोणताही अडथळा नव्हता, मात्र कोणतीही राजकीय कृती करण्यास त्यांना मनाई होती.

पुढे २२ फेब्रुवारी १९४४ पर्यंत (याच दिवशी कस्तुरबांचे निधन झाले.) हे दाम्पत्य आगाखान पॅलेसमध्येच नजरकैदेत होते. महादेवभाई देसाई हे गांधींजींचे लेखनिकही त्यांच्यासमवेत होते. कस्तुरबांना या निमित्ताने पतीचा सहवास मिळाला. महादेवभाईंनी त्यांच्या दैनंदिनीत दोघांच्याही दिनचर्येविषयी लिहिले आहे. दोघेही एकमेकांचा कसा सन्मान ठेवत याचे उल्लेख त्यात आहेत. महात्मा गांधीजींचे मोठेपण कस्तुरबांनी लक्षात घेतले होते, मात्र तरीही पती म्हणून त्यांच्या गांधीजींकडून अपेक्षा होत्या. गांधीजी त्यांचा आदर करत.

कस्तुरबा आजारी पडल्या, त्यावेळी नेहमी स्थितप्रज्ञ असलेले महात्मा गांधीही सैरभैर झाले होते. नैसर्गिक उपचार करायचे की डॉक्टरचे यावर त्यांची त्यांची स्वत:ची अशी मते होती. अखेर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबांची प्राणज्योत मालवली. गांधीजी त्यादिवशी खिन्न झाले होते. कधी नव्हे ते त्यांच्या मुद्रेवरचे प्रसन्न हास्य मावळले होते.

                                                                                                                                                - राजू इनामदार 

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीhusband and wifeपती- जोडीदारSocialसामाजिकIndiaभारतFamilyपरिवार