शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Mahatma Gandhi Jayanti: गांधीजी-कस्तुरबांच्या सहजीवनाची हृद्य अखेर पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:51 IST

इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला, भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला, तेव्हा गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले

ऑगस्ट १९४२ मध्ये महात्मा गांधींना इंग्रज सरकारने आगाखान पॅलेसमध्ये आणले. कस्तुरबा गांधी त्यांच्यासमवेत होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाडाची काडे करणाऱ्या आपल्या थोर पतीचा दीर्घ सहवास या निमित्ताने प्रथमच कस्तुरबांना मिळाला. त्या समाधानातच बहुधा त्यांनी याच आगाखान पॅलेसमध्ये आपले डोळे मिटले. त्यावेळी हा थोर महात्मा बराच काळ उदास झाला होता.

महात्मा गांधी व कस्तुरबा यांचे सहजीवन आदर्श असेच होते. कस्तुरबांनी आपल्या जगावेगळ्या पतीचे मोठेपण मान्य करत त्यांच्या कार्यात स्वत:ला समर्पित केले होते; तर जगाला सत्याचे प्रयोग करून दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांनी आपल्या पत्नीच्या शब्दांना नेहमीच मान देत आदर केला. त्यांच्या या आदर्श सहजीवनाची अखेर पुण्यात झाली.

या पत्नी-पत्नींना इंग्रज सरकारने आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या या सहजीवनाचा अल्पकाळ का होईना, आगाखान पॅलेस साक्षीदार झाला, मात्र कस्तुरबांचे निधन आपल्याच आवारात होईल व या सहजीवनाची अखेर आपल्याला पाहावी लागेल, अशी कल्पनाही पॅलेसने केली नसेल.

मात्र तसेच झाले. इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला. भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला. देशभर चळवळ सुरू झाली. इंग्रजांनी सर्व नेत्यांना अटक केली. गांधी वगळता सर्व नेत्यांनी त्यांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात पाठवले. महात्मा गांधींना मात्र पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले. कस्तुरबांना त्यांच्यासमवेत देण्यात आले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना या पॅलेसमध्ये आणले गेले. त्यांच्यावर इंग्रज पोलिसांची सक्त नजर होती. त्यांना त्यांचे दैनंदिन काम करण्यात कोणताही अडथळा नव्हता, मात्र कोणतीही राजकीय कृती करण्यास त्यांना मनाई होती.

पुढे २२ फेब्रुवारी १९४४ पर्यंत (याच दिवशी कस्तुरबांचे निधन झाले.) हे दाम्पत्य आगाखान पॅलेसमध्येच नजरकैदेत होते. महादेवभाई देसाई हे गांधींजींचे लेखनिकही त्यांच्यासमवेत होते. कस्तुरबांना या निमित्ताने पतीचा सहवास मिळाला. महादेवभाईंनी त्यांच्या दैनंदिनीत दोघांच्याही दिनचर्येविषयी लिहिले आहे. दोघेही एकमेकांचा कसा सन्मान ठेवत याचे उल्लेख त्यात आहेत. महात्मा गांधीजींचे मोठेपण कस्तुरबांनी लक्षात घेतले होते, मात्र तरीही पती म्हणून त्यांच्या गांधीजींकडून अपेक्षा होत्या. गांधीजी त्यांचा आदर करत.

कस्तुरबा आजारी पडल्या, त्यावेळी नेहमी स्थितप्रज्ञ असलेले महात्मा गांधीही सैरभैर झाले होते. नैसर्गिक उपचार करायचे की डॉक्टरचे यावर त्यांची त्यांची स्वत:ची अशी मते होती. अखेर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबांची प्राणज्योत मालवली. गांधीजी त्यादिवशी खिन्न झाले होते. कधी नव्हे ते त्यांच्या मुद्रेवरचे प्रसन्न हास्य मावळले होते.

                                                                                                                                                - राजू इनामदार 

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीhusband and wifeपती- जोडीदारSocialसामाजिकIndiaभारतFamilyपरिवार