शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी "थरूर" नामा : ३७० कलमासह, झुंडशाही, हिंदुत्व, अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 8:00 AM

भाजपाकडून महात्मा गांधी व सरदार पटेल यांचे विचार सोयीनुसार हायजॅक केले जात आहेत...

ठळक मुद्देसोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जावू, असा विश्वाससभागृहामध्ये तरूणांची उपस्थिती लक्षणीय

पुणे : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार शशी थरूर यांनी ३७० कलमासह झुंडशाही, हिंदुत्व, हिंदी भाषा अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र सोडले. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही खडे बोल सुनावले. त्यांच्या भाषणाची शैली व आक्रमकता काँग्रेस भवनमधील तरूण कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही भावली. कार्यकर्त्यांसाठी हे भाषण आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जणू चैतन्य देणारे ठरले. काँग्रेस भवनमध्ये रविवारी शशी थरूर यांनी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील तरूण व्यावसायिक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सभागृहामध्ये तरूणांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच राजकारणापासून दुर राहणाऱ्या तरूणांना उद्देशून केली. अनेक व्यावसायिक तरूण राजकारणात आल्यास त्यांचे विचार, नवनवीन कल्पना शासनापर्यंत पोहचू शकतात. त्यासाठी राजकारणात या, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर मात्र त्यांनी केंद्र सरकार व भाजपाच्या नीतीवर चौफेर टीका केली. भाजपाकडून महात्मा गांधी व सरदार पटेल यांचे विचार सोयीनुसार हायजॅक केले जात आहेत. स्वातंत्र्यानंतर पटेलांनाही गांधीवाद हाच खरा राष्ट्रवाद असल्याचे पटले होते. पण भाजपाकडून काही गोष्टी जाणीवपुर्वक लपविल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. काश्मीरमधून हटविण्यात आलेले कलम ३७०, हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात मुस्लिम तरूणांच्या होत असलेल्या हत्या, श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती, हिंदी भाषेबाबत अमित शहा यांची भुमिका अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. हिंदु धर्म व श्रीरामाचाही अपमान करणारे असले हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचे परखड मत यांनी मांडले. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या मताला सकारात्मक प्रतिसाद दिला. भाजपावर टीका करताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही धारेवर धरले. काँग्रेसच्या तत्वांना तिलांजली देणाऱ्या संधीसाधू नेत्यांनी खुशाल जावे. पक्षासोबत राहणारेच महत्वाचे आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक मुद्दा प्रखरपणे मांडत त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याविषयी कसबा ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, थरूर यांचे विचार तरूणाईला नेहमीच आकर्षित करतात. भाषणातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडल्या आहेत. हे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सर्व प्रमुख शहरांमध्ये त्यांची भाषणे व्हायला हवीत. पक्ष संघटनेला दिशा, चैतन्य देणाऱ्या अशा नेत्याची गरज आहे.   ............महात्मा गांधी व पंडित नेहरू यांचे विचारच देशाला तारू शकतात, हे थरूर यांनी पटवून दिले. भाजपाकडून सरदार पटेल आणि काँग्रेसविषयी केली जात असलेली चुकीची मांडणीही त्यांनी खोडून काढली. तरूणांना ही भुमिका पटल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले. त्यांचे भाषण कार्यकर्त्यांना चेतना देणारे ठरले. - रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस----------------शशी थरूर यांचे भाषण कार्यकर्त्यांना दिशा देणारे ठरले. विकासाचे मुद्दे घेऊन भाजपा निवडणुकीला सामोरे जात नाही. भावनिक वातावरण निर्माण केले जात आहे. ३७० कलमाचा निवडणुकीशी संबंध नाही. पण अमित शहा मुंबईत व्याख्यान देतात. त्याला उत्तर देण्याचे काम थरूर यांनी केले आहे. - मोहन जोशी, ज्येष्ठ नेते

टॅग्स :PuneपुणेShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपा