शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवादात वाढ - तलमीज अहमद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 7:21 PM

पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी  राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले. 

पुणे - पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी  राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले. सविताबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सेक्युरिटी अँड डिफेन्स अनलिसिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय संबंध या व्याख्यानमालेत 'पोलिटिकल इस्लाम अँड ग्लोबल जिहाद; चैलेंजस फॉर ग्लोबल सेक्यरिटी' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमद बोलत होते. या प्रसंगी निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. एम. हारीस, माजी राजदूत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक श्रीनिवास सोहनी, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्तीत होते.

अहमद म्हणाले, धर्म या संकल्पनेवर विचारवंतांचा पगडा आहे. याबरोबरच धर्माला प्रसिद्धी देणारे आणि गुढवादी संकल्पनेत वावरणारे धर्माचा आधार घेतात. सर्वसामान्यांचा धर्मावर असलेल्या विश्वासाचा फायदा आज राजकीय लोक त्याच्या स्वार्थासाठी वापरतात. त्याचा श्रद्धेचा वापर करून त्यांना राजकीय प्रवाहात ही मंडळी खेचताना आज जगात दिसते.

श्रीनिवास सोहनी म्हणाले, इस्लाम मध्ये असलेल्या काही गोष्टीचा काही कट्टर लोक गैरफायदा घेत आहेत. लोकांसमोर त्याचे चुकीचे सादरीकरण करून त्यांना दहशतवादी बनविलेले जात आहे. त्यांना आणखी कट्टर कसे बनवता येईल यावर ते भर देत आहेत. हे धोक्याची बाब आहे.

पी. एम हारीस म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून लोकांवर धर्माचा पगडा वाढत आहे. पूर्वीच्या तुलनेत आज मुस्लिम महिलांमध्ये बुरखा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. पुर्वी ही परिस्तिथी नव्हती. हा कट्टरता वाद का वाढत आहे याचा अभ्यास आज होणे गरजेचे आहे. हे करत असताना त्यांना सर्वसमावेशक विकासात आणणे गरजेचे आहे. याचबरोबर याचे जागतिक, आर्थिक, सामाजिक तसेच लष्करी दृष्ट्या होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :TerrorismदहशतवादPuneपुणेnewsबातम्या