शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवादात वाढ - तलमीज अहमद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:22 IST

पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी  राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले. 

पुणे - पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी  राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले. सविताबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सेक्युरिटी अँड डिफेन्स अनलिसिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय संबंध या व्याख्यानमालेत 'पोलिटिकल इस्लाम अँड ग्लोबल जिहाद; चैलेंजस फॉर ग्लोबल सेक्यरिटी' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमद बोलत होते. या प्रसंगी निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. एम. हारीस, माजी राजदूत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक श्रीनिवास सोहनी, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्तीत होते.

अहमद म्हणाले, धर्म या संकल्पनेवर विचारवंतांचा पगडा आहे. याबरोबरच धर्माला प्रसिद्धी देणारे आणि गुढवादी संकल्पनेत वावरणारे धर्माचा आधार घेतात. सर्वसामान्यांचा धर्मावर असलेल्या विश्वासाचा फायदा आज राजकीय लोक त्याच्या स्वार्थासाठी वापरतात. त्याचा श्रद्धेचा वापर करून त्यांना राजकीय प्रवाहात ही मंडळी खेचताना आज जगात दिसते.

श्रीनिवास सोहनी म्हणाले, इस्लाम मध्ये असलेल्या काही गोष्टीचा काही कट्टर लोक गैरफायदा घेत आहेत. लोकांसमोर त्याचे चुकीचे सादरीकरण करून त्यांना दहशतवादी बनविलेले जात आहे. त्यांना आणखी कट्टर कसे बनवता येईल यावर ते भर देत आहेत. हे धोक्याची बाब आहे.

पी. एम हारीस म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून लोकांवर धर्माचा पगडा वाढत आहे. पूर्वीच्या तुलनेत आज मुस्लिम महिलांमध्ये बुरखा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. पुर्वी ही परिस्तिथी नव्हती. हा कट्टरता वाद का वाढत आहे याचा अभ्यास आज होणे गरजेचे आहे. हे करत असताना त्यांना सर्वसमावेशक विकासात आणणे गरजेचे आहे. याचबरोबर याचे जागतिक, आर्थिक, सामाजिक तसेच लष्करी दृष्ट्या होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :TerrorismदहशतवादPuneपुणेnewsबातम्या