शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवादात वाढ - तलमीज अहमद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:22 IST

पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी  राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले. 

पुणे - पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे भारतातील माजी  राजदूत तलमीज अहमद यांनी व्यक्त केले. सविताबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सेक्युरिटी अँड डिफेन्स अनलिसिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय संबंध या व्याख्यानमालेत 'पोलिटिकल इस्लाम अँड ग्लोबल जिहाद; चैलेंजस फॉर ग्लोबल सेक्यरिटी' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमद बोलत होते. या प्रसंगी निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. एम. हारीस, माजी राजदूत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक श्रीनिवास सोहनी, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्तीत होते.

अहमद म्हणाले, धर्म या संकल्पनेवर विचारवंतांचा पगडा आहे. याबरोबरच धर्माला प्रसिद्धी देणारे आणि गुढवादी संकल्पनेत वावरणारे धर्माचा आधार घेतात. सर्वसामान्यांचा धर्मावर असलेल्या विश्वासाचा फायदा आज राजकीय लोक त्याच्या स्वार्थासाठी वापरतात. त्याचा श्रद्धेचा वापर करून त्यांना राजकीय प्रवाहात ही मंडळी खेचताना आज जगात दिसते.

श्रीनिवास सोहनी म्हणाले, इस्लाम मध्ये असलेल्या काही गोष्टीचा काही कट्टर लोक गैरफायदा घेत आहेत. लोकांसमोर त्याचे चुकीचे सादरीकरण करून त्यांना दहशतवादी बनविलेले जात आहे. त्यांना आणखी कट्टर कसे बनवता येईल यावर ते भर देत आहेत. हे धोक्याची बाब आहे.

पी. एम हारीस म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून लोकांवर धर्माचा पगडा वाढत आहे. पूर्वीच्या तुलनेत आज मुस्लिम महिलांमध्ये बुरखा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. पुर्वी ही परिस्तिथी नव्हती. हा कट्टरता वाद का वाढत आहे याचा अभ्यास आज होणे गरजेचे आहे. हे करत असताना त्यांना सर्वसमावेशक विकासात आणणे गरजेचे आहे. याचबरोबर याचे जागतिक, आर्थिक, सामाजिक तसेच लष्करी दृष्ट्या होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :TerrorismदहशतवादPuneपुणेnewsबातम्या