शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:13 IST

महापरीक्षा पोर्टद्वारे परीक्षा घेवून झालेल्या पोलीस भरतीत गैरप्रकार

ठळक मुद्देपोलीस भरती प्रक्रियेत मागील सरकारने केला बदलशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांची पोलीस पदावर झाली पाहिजे नियुक्ती सर्व सामान्य घरातील व ग्रामीण भागातील तरूणांवर त्याचा प्रतिकूल परिणाम

पुणे : कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात मोठे योगदान देणाऱ्या पोलिसांच्या भरती प्रकियेत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांची पोलीस पदावर नियुक्ती झाली पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने पोलीस भरती करताना प्रथम मैदानी चाचणी घेवून त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घ्यावी, या मागणीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.पोलीस भरती प्रक्रियेत मागील सरकारने बदल केला. शारीरिक चाचणीला कमी महत्व देवून लेखा परीक्षेला अधिक महत्त्व दिले. मात्र, त्यामुळे सर्व सामान्य घरातील व ग्रामीण भागातील तरूणांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. माजी उपमुखमंत्री आर. आर. पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती केल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक तरूण-तरूणींना थेट फायदा झाला. त्यामुळे मागील शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असे सुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.शासनाने पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेप्रमाणे मैदानी चाचणी सुध्दा १०० गुणांची घ्यावी. लेखी परीक्षा महापोर्टलच्या माध्यमातून न घेता मैदानी चाचणीनंतर लगेचच आॅफलाईन पध्दतीने घ्यावी. तसेच भरतीचे वेळापत्रकही वर्षभर आधी जाहिर करावे. तसेच पदांची संख्या वाढवून मेगाभरती करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.पोलिसांवरील जबाबदाºयामध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. त्यामुळे पोलीस भरतीतून निवडला जाणारा उमेदवार सर्वदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. परंतु, पोलीस भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या या मैदानी चाचणीसाठी केवळ ५० गुण ठेवले आहेत. पोलीस भरतीसाठी अर्ज करणाºया लाखो उमेदवारांची लेखी परीक्षा घेणे सहज शक्य होत नाही. प्रथम शारीरिक चाचणी घेतल्यास लेखी चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी होईल. तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची राज्याच्या पोलीस दलात नियुक्ती करता येईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी सुध्दा याबाबत वेळोवेळी आंदोलने केली होती.--पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीचे महत्त्व कमी केले. त्यानंतर महापरीक्षा पोर्टद्वारे परीक्षा घेवून झालेल्या पोलीस भरतीत गैरप्रकार झाले आहे. पोलीस खात्यात सक्षम असणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने लेखी परीक्षेला प्राधान्य दिल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे प्रथम मैदाणी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घ्यावी.- अविनाश माने, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा --शासनाने मैदानी चाचणीतून लांब उडी आणि जोर काढणे वगळे आहे. केवळ गोळाफेक व धावणे हे प्रकार ठेवले आहेत. त्यातून सक्षमता तपासता येत नाही. तसेच या मैदानी चाचणीसाठी उत्तीर्णतेची मर्यादाही ठेवलेली नाही. या निर्णयामुळे पोलीस खात्यात शारीरिकदृष्ट्या असक्षम उमेदवार जाण्याची भिती आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी सुरूवातीला १०० गुणांची मैदानी चाचणी घ्यायला हवी. - दत्ता सरडे, प्रशिक्षक, मैदानी चाचणी

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliceपोलिसonlineऑनलाइनBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे