शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:13 IST

महापरीक्षा पोर्टद्वारे परीक्षा घेवून झालेल्या पोलीस भरतीत गैरप्रकार

ठळक मुद्देपोलीस भरती प्रक्रियेत मागील सरकारने केला बदलशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांची पोलीस पदावर झाली पाहिजे नियुक्ती सर्व सामान्य घरातील व ग्रामीण भागातील तरूणांवर त्याचा प्रतिकूल परिणाम

पुणे : कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात मोठे योगदान देणाऱ्या पोलिसांच्या भरती प्रकियेत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांची पोलीस पदावर नियुक्ती झाली पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने पोलीस भरती करताना प्रथम मैदानी चाचणी घेवून त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घ्यावी, या मागणीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.पोलीस भरती प्रक्रियेत मागील सरकारने बदल केला. शारीरिक चाचणीला कमी महत्व देवून लेखा परीक्षेला अधिक महत्त्व दिले. मात्र, त्यामुळे सर्व सामान्य घरातील व ग्रामीण भागातील तरूणांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. माजी उपमुखमंत्री आर. आर. पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती केल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक तरूण-तरूणींना थेट फायदा झाला. त्यामुळे मागील शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असे सुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.शासनाने पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेप्रमाणे मैदानी चाचणी सुध्दा १०० गुणांची घ्यावी. लेखी परीक्षा महापोर्टलच्या माध्यमातून न घेता मैदानी चाचणीनंतर लगेचच आॅफलाईन पध्दतीने घ्यावी. तसेच भरतीचे वेळापत्रकही वर्षभर आधी जाहिर करावे. तसेच पदांची संख्या वाढवून मेगाभरती करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.पोलिसांवरील जबाबदाºयामध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. त्यामुळे पोलीस भरतीतून निवडला जाणारा उमेदवार सर्वदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. परंतु, पोलीस भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या या मैदानी चाचणीसाठी केवळ ५० गुण ठेवले आहेत. पोलीस भरतीसाठी अर्ज करणाºया लाखो उमेदवारांची लेखी परीक्षा घेणे सहज शक्य होत नाही. प्रथम शारीरिक चाचणी घेतल्यास लेखी चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी होईल. तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची राज्याच्या पोलीस दलात नियुक्ती करता येईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी सुध्दा याबाबत वेळोवेळी आंदोलने केली होती.--पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीचे महत्त्व कमी केले. त्यानंतर महापरीक्षा पोर्टद्वारे परीक्षा घेवून झालेल्या पोलीस भरतीत गैरप्रकार झाले आहे. पोलीस खात्यात सक्षम असणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने लेखी परीक्षेला प्राधान्य दिल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे प्रथम मैदाणी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घ्यावी.- अविनाश माने, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा --शासनाने मैदानी चाचणीतून लांब उडी आणि जोर काढणे वगळे आहे. केवळ गोळाफेक व धावणे हे प्रकार ठेवले आहेत. त्यातून सक्षमता तपासता येत नाही. तसेच या मैदानी चाचणीसाठी उत्तीर्णतेची मर्यादाही ठेवलेली नाही. या निर्णयामुळे पोलीस खात्यात शारीरिकदृष्ट्या असक्षम उमेदवार जाण्याची भिती आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी सुरूवातीला १०० गुणांची मैदानी चाचणी घ्यायला हवी. - दत्ता सरडे, प्रशिक्षक, मैदानी चाचणी

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliceपोलिसonlineऑनलाइनBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे