शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

तलाव भरण्यासाठी ‘टेल टू हेड’, पालकमंत्र्यांच्या सूचना, पाणीवापराबाबत नियोजन, यंदा ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 02:53 IST

खडकवासला प्रकल्पांतर्गत २०१७-१८च्या खरीप हंगामातील पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील एकूण ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पाणी नियोजन करण्यात आले आहे. या वेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सर्व तलाव भरून देण्याची मागणी केली, तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तलाव भरण्याच्या तसेच ‘टेल टू हेड’ पाणी देण्याबाबत अधिका-यांना सूचना केल्या.

बारामती : खडकवासला प्रकल्पांतर्गत २०१७-१८च्या खरीप हंगामातील पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील एकूण ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पाणी नियोजन करण्यात आले आहे. या वेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सर्व तलाव भरून देण्याची मागणी केली, तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तलाव भरण्याच्या तसेच ‘टेल टू हेड’ पाणी देण्याबाबत अधिका-यांना सूचना केल्या.खडकवासला प्रकल्पांतर्गत खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांतील पाणी खडकवासलाच्या नवीन मुठा कालव्यामार्फत हवेली, दौंड, इंदापूर व बारामती या चार तालुक्यांतील ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राला यंदा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या कालव्यामधून वरवंड व शिर्सुफळ तलावात पाणी सोडून त्याद्वारे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे १३ हजार ८३५ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची तरतूद प्रकल्प अहवालामध्ये आहे. यामध्ये सणसर जोड कालव्यावरील ११ हजार ३८८ हेक्टर क्षेत्र मात्र या नियोजनात समावेश करण्यात आलेला नाही. हवेली तालुक्यातील ५ हजार ७८५ हेक्टर, दौंड तालुक्यातील २८ हजार ५५ हेक्टर क्षेत्र, बारामती तालुक्यातील ९८० हेक्टर क्षेत्र व इंदापूर तालुक्यातील १५ हजार ९३८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या शिवाय पुणे शहर, दौंड, इंदापूर नगरपालिका व २२ ग्रामपंचायती, ९२ संस्थांना पिण्यासाठी व ३१ संस्थांना औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जाते.यंदाच्या वर्षी पुणे महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी ५ टीएमसी पाणी एका वर्षामध्ये वापरास शासनाची मान्यता आहे, तर अतिरिक्त लोकसंख्येला ६.५ टीएमसी असा एकूण ११.५० टीएमसी पाणी वापरास मंजुरी आहे. सध्या पुणे महानगरपालिकेकडून १ हजार ३५० एमएलडी पाणी दररोज वापरण्यात येत आहे. त्यानुसार ९३ दिवसांसाठी ४.३७ टीएमसी पाणी खडकवासलामधून पुणे महानगरपालिका वापरणार आहे. परिणामी, शासन मान्यतेपेक्षा १.४२ टीएमसी पाणी पुणे महानगरपालिका जास्ता वापरणार आहे. धरणामध्ये ६६ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून २२ जुलै २०१७ ला आवर्तन सुरू करण्यात आले होते.खरीप हंगामासाठी ५.४६ टीएमसी, बिगर सिंचनासाठी ०.१४ टीएमसी, तर वरवंड व शिर्सुफळ तलाव भरण्यासाठी ०.२८ टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव होता. यापैकी धरणातून २२ जुलै ते १० सप्टेंबर दरम्यान ६.०५ टीएमसी पाणीवापर झाला आहे.खरीप हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर, सांडव्यावरून पाणी वाहत असल्यास खरिपाचे दुसरे आवर्तन सलगपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, जर पावसाचा जोर कमी झाला व सांडव्यावरून पाणी वाहने बंद झाले तर सिंचनाच्या गरजेनुसारच धरण १०० टक्के भरल्यानंतर, दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार अजित पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार दत्तात्रय भरणे, जयदेव गायकवाड, राहुल कुल, बाबूराव पाचर्णे, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, खडकवासला विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.रब्बी व खरीप हंगामातील सिंचनावर ताणखडकवासला प्रकल्पातून पुणे महानगरपालिका पिण्याच्या पाण्यासाठी वार्षिक १६.५० टीएमसी इतके पाणी वापरते. पुणे महानगरपालिका मंजुरीपेक्षा ५ टीएमसी पाणी जास्त वापरत आहे. त्यामुळे रब्बी व खरीप हंगामातील सिंचनावर ताण येत आहे. यंदाच्या वर्षी टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.शासनाच्या तज्ज्ञ समितीने ६९५ मीटरपर्यंतच पाणीपातळी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंदा टेमघरमध्ये १.७५ टीएमसी पाणीसाठा कमी असणारआहे. त्यामुळे काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राला यंदा पाणी देण्याचे उद्दिष्ट.जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे १३ हजार ८३५ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची तरतूद.पुणे महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी ५ टीएमसी पाणी एका वर्षामध्ये वापरास शासनाची मान्यता.सध्या पुणे महानगरपालिकेकडून १ हजार ३५० एमएलडी पाणी दररोज वापरण्यात येत आहे.