शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

दूध, साखरेचे दर वाढल्याने मिठाई महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:14 IST

ग्राहकांना आर्थिक फटका : मिठाईचे भाव किलोमागे २० रुपयांपर्यंत वाढले (स्टार ११८० डमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात ...

ग्राहकांना आर्थिक फटका : मिठाईचे भाव किलोमागे २० रुपयांपर्यंत वाढले

(स्टार ११८० डमी)

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात साखरेचे दर चार ते सहा रुपयांनी, तर दुधाचे दर दोन ते चार रुपयांनी वाढले आहेत. त्याचा परिणाम मिठाईच्या दरावरदेखील झाला आहे. सणासुदीच्या काळात विशेषत: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध, साखरेचे दर वाढल्याने मिठाईच्या भावात किलोमागे जवळपास २० रुपयांपर्यंत भाव वाढल्याने त्याचा ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवाचा उत्साह थोडा जास्त दिसत आहे. गणेशोत्सवात मोदक तसेच विविध प्रकारच्या मिठाईंना चांगली मागणी असते. मिठाई बनवताना दूध आणि साखरेचा वापर प्रामुख्याने होत असल्याने त्याचा दरावर परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेषत: काजू कतली, चॉकलेट बर्फी, मँगो मलाई, पिस्ता बर्फी, कलाकंद, मलई बर्फी, गुलाब जाम (काळा), गुलाब जाम (पाक), सोनपापडी, म्हैसूर पाक आदी मिठाईच्या भावात १५ ते २० रुपयांपर्यंत किलोमागे वाढ झाली आहे.

-----

१) मिठाईचे दर (प्रतिकिलो)

मिठाई सध्याचा दर गणेशोत्सवाआधी

* काजू कतली ९६० ९४०

* चॉकलेट बर्फी ५६० ५४०

* मँगो मलाई ६०० ५८०

* पिस्ता बर्फी ५६० ५४०

* कलाकंद ५६० ५४०

* मलई बर्फी ५६० ५४०

* गुलाब जाम (काळा) ३२० ३००

* गुलाब जाम (पाक) २८० २७०

* सोनपापडी २८० २६०

* म्हैसूर पाक २८० २६०

------

मुद्दे ----

* दुधाचे दर (लिटर) ६२ से ६६ रुपये

* साखरेचे दर (किलो) ३८ ते ४० रुपये

----

* का वाढले दर?

मागील काही दिवसांत दुधाचे भाव चांगलेच वाढले आहे. मिठाई बनवताना सर्वांत जास्त दुधाचा वापर होतो. तसेच, साखरदेखील लागते. दूध आणि साखर या दोघांचेही भाव वाढल्याने साहजिकच मिठाई उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे किलोमागे काही प्रमाणात मिठाईचे दर वाढलेले आहेत.

- राकेश लाहोटी, स्वीट मार्टचालक

-----

* भेसळीकडे लक्ष असू द्या

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांना सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. विक्रेत्यांना अनेक प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तंतोतत पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनीदेखील वस्तूची खरेदी करताना काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करून विक्रेत्यांनी जर भेसळीच्या वस्तू विकल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भेसळ रोखण्यासाठी दिवाळी सणापर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले.

----

* ग्राहक म्हणतात..

गणेशोत्सव असो की इतर सण. सणासुदीच्या काळात घराघरात मिठाई लागतेच. सध्या दैनंदिन विविध वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, सण असल्याने दर वाढले तरी मिठाई लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करून मिठाई खरेदी करावीच लागते.

- नितीन कदम, ग्राहक

----

* दरांवर नियंत्रण कोणाचेच नाही?

प्रत्येक नागरिकांसाठी सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी त्याचबरोबर भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे. मात्र, विक्रेत्यांनी कोणत्या मिठाईचे दर किती ठेवायचे याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला नाहीत. त्यामुळे मिठाईच्या वाढणाऱ्या दरावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.