शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

"कोल्हापूर उत्तरचा विजय जनतेचा कौल नाही..." 'मविआ'च्या विजयावर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 1:35 PM

कोल्हापूर उत्तर विधानसभा निकालावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

पुणे :कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज होता. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात लढत झाली. सध्याचे निकालाचे कल पाहिले तर ही निवडणूक जवळपास महाविकास आघाडीने जिंकली आहे. यावर बोलताना स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी म्हणाले, हा विजय जनतेचा कौल वगैरे काही नाही. आमची या निवडणूकीत भूमिकाच नव्हती. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टी यांनी कोल्हापुरच्या निवडणुकीवर प्रश्न विचारल्यावर प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. दुसरीकडे वीज, शेती' विद्यार्थी बेरोजगारी, इंधन दरवाढ याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या राज्यात पातळीहीन राजकारण सुरू आहे. महागाईमुळे सामान्य लोक त्रस्त आहेत. नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत राजकारण सुरू आहे. शेती मालाला भाव नाही, योग्य नियोजन नाही, डाळी, तेल प्रचंड महागले आहे त्यात भोंगे कसले वाजवता असा प्रश्नही शेट्टी यांनी विचारला आहे.

"राज्य सरकारचा 'या' कारणामुळे पाठिंबा काढला"-

स्वाभिमानी पक्षाने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याचे जाहीर केले होते. याचे कारण सांगताना शेट्टी म्हणाले, 'दोन टप्प्यात एफआरपी हा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा आहे त्यामुळे स्वाभिमानीने पाठिंबा काढला.' 

पोटापाण्याचा धंदा म्हणून मी राजकारण करत नाही. आतापर्यंत बराच अनुभव घेतलाय. आता राज्यात शेतकऱ्यांचा दबावगट तयार करणार आहोत. आम्ही तयार केलेले आमदार आम्हाला सोडतात तर सोडू द्या, अशा गद्दारांना बरोबर ठेवून कधीच काम करणार नाही, असंही शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी