शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नाटकांचा दबदबा

By admin | Updated: January 25, 2015 00:29 IST

मराठी नाटकांमध्ये कालपरत्वे संवाद, लेखनशैलीपासून ते अभिनय, सादरीकरणापर्यंत अनेक बदल झाले आहेत, जे निश्चितच सकारात्मक असेच आहेत.

नम्रता फडणीस - पुणेमराठी नाटकांमध्ये कालपरत्वे संवाद, लेखनशैलीपासून ते अभिनय, सादरीकरणापर्यंत अनेक बदल झाले आहेत, जे निश्चितच सकारात्मक असेच आहेत. आज रंगभूमीवर सकस लेखन होत नसल्याचे जरी म्हटले जात असले तरी मराठी रंगभूमीवर सातत्याने होत असलेल्या विविधांगी प्रयोगांमुळे प्रादेशिक भाषांमध्ये मराठी नाटकांचा दबदबा कायम असल्याचे ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी सांगितले. नाटककार, अभिनेता आणि दिग्दर्शक अशा तिहेरी माध्यमातून मराठी रंगभूमीला भरीव योगदान दिलेले सतीश आळेकर येत्या ३0 जानेवारी रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण करीत आहेत. तसेच त्यांच्या ‘महानिर्वाण’ या नाटकाला नुकतीच ४0 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन्हींचे औचित्य साधून आळेकर यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, नाट्यलेखनासह नाटकांमध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. ‘अतिरेकी’, ‘दूसरा सामना’, ‘महापूर’ ‘बेगम बर्वे’, ‘महानिर्वाण’ यांसारख्या दर्जात्मक नाट्यलेखनशैलीच्या त्यांच्या कलाकृती मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरल्या. काळानुरूप बदलत्या परिस्थितीवर भाष्य करीत, त्या विषयांना गडदतेच्या विविधांगी शेड्स देत त्यातील आशयघनता प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य. म्हणूनच त्यांच्या नाट्यकलाकृतींचे विषय हे आजच्या काळातही तितकेच सुसंगत वाटतात.त्यांच्या ‘महापूर’ आणि ‘महानिर्वाण’ नाटकांनी देशाच्या सीमाच केवळ ओलांडल्या नाही, तर त्यांची काही नाटके अन्य भाषांमध्येही अनुवादित झाली आहेत. ननाटकाच्या बदलत्या प्रवाहाविषयी बोलताना ते म्हणाले, पूर्वी एक गाव- एक संस्कृती या पद्धतीमुळे नाटकांचा प्रेक्षकवर्ग विखुरला जात नव्हता, आता वेगवान जीवनशैली, पृथक जगणे, वाढलेली लोकसंख्या यामुळे नाटकांसाठी एकसंध असे वातावरण राहिलेले नाही. यातच विरंगुळ्यासाठी विविध पर्यायांची व्याप्तीही वाढलेली आहे. नाटक कुणासाठी करतो तर प्रेक्षकांसाठी. त्यामुळे नाटकांना गर्दी होणे आवश्यक आहे. लोकप्रिय नाटकांमुळेच प्रेक्षकांची पावले नाट्यगृहांकडे वळतात हेदेखील तितकेच खरे आहे. पण आमच्या फळीनंतर संजय पवार, प्रमोद साठे, ईरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र यांसारख्या लेखकांची पिढी तयार झाली आहे.पूर्वी सई परांजपे ही केवळ एकच महिला लेखिका होती, मात्र महिलाही नाट्यलेखनामध्ये उतरल्या आहेत, ही सकारात्मक बाब आहे. नाट्यलेखनात प्रयोग झालेले दिसत नसले तरी नाटकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खूप बदल झालेले आहेत. दुसरीकडे देशातील विविध भागांमध्ये इतर नाटककारांनी जशी नाटकांची प्रतिसृष्टी निर्माण केली तसे धाडस महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीकडून झाले नसल्याची खंतही आळेकर व्यक्त करतात. ४ सध्या नाट्यलेखनापेक्षा ‘लघुकथा’ अधिक प्रगल्भ झालेल्या दिसतात. प्रशांत बागड, जयंत पवार यांसारख्या मंडळींनी लघुकथेला एक वेगळा आयाम दिला आहे. यामुळे नाटकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी साहित्याचा फायदा झाला असल्याचे ते सांगतात. तसेच मराठी रंगभूमीवर जेवढे नवनवीन प्रयोग होताना दिसतात तेवढे इतर भाषिक रंगभूमीवर ते फारसे होताना दिसत नाहीत. म्हणूनच मराठी नाटकांचा दबदबा प्रादेशिक भाषांमध्ये आजही कायम असल्याचे स्पष्ट करीत मराठी नाटकांची प्रतिसृष्टी इतर ठिकाणी निर्माण करण्यात आपण कमी पडत असल्याची खंतही ते व्यक्त करतात. ४ ’महानिर्वाण’ नाटकात मृत्यूवर भाष्य करताना गांभीर्य आणि विनोदाचे मिश्रण सादर करण्यात आले होते. या विषयाकडे काहीशा तिरकस दृष्टिकोनातून पाहण्याचा तो प्रयत्न होता. यांसारख्या जुन्या नाटकांचे प्रयोग युवापिढीकडून पुनश्च झाल्यास निश्चितच आवडेल, असेही सतीश आळेकर म्हणाले.