शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

जिल्ह्यात चांगला पाऊस होताच ऊस लागवडीला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:09 PM

जिल्ह्यामधील १३ पैकी १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील स्थिती : रब्बी पिकांपेक्षा ऊस लागवडच अधिकराज्यात २०१७-१८ आणि २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदरमधे ऊस लागवडीच्या कामांना वेगया काळात देशात देखील विक्रमी साखर उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखर शिल्लक

पुणे : चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ऊस लागवडीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात २३ हजार ७३० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. रब्बी हंगामातील तृण व अन्नधान्यांपेक्षा ६ हजार हेक्टरने ऊस क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यामधील १३ पैकी १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पर्जन्य छायेतील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाली आहे. राज्यात २०१७-१८ आणि २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या काळात देशामधेदेखील विक्रमी साखर उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने दिलेली ओढ, दुष्काळजन्य स्थितीमुळे चारा म्हणून उसाचा झालेला वापर आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या ऊस पट्ट्यामध्ये आॅगस्ट महिन्यात आलेला पूर यामुळे २०१९-२० हा अगामी गाळप हंगाम अडचणीत आला आहे. राज्यातील साखर उत्पादन ६० लाख टनापर्यंत खाली घसरेल, असा अंदाज आहे.  जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने नीरा धरणातून सोडलेले पाणी, मुठा उजवा कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे दौंड-इंदापूर भागातील भरलेले पाझर तलाव या मुळे शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदरमधे ऊस लागवडीच्या कामांना वेग आला आहे. शिरूरमध्ये सर्वाधिक ६,७७५, दौंडमधे ६,०६६ व बारामती तालुक्यात ३,५३८ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा ८९ टक्के पाऊस झालेल्या इंदापूर तालुक्यातही १ हजार ५९६ हेक्टरवर ऊस लागण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली. ,.........

जिल्ह्यातील ऊस लागवडीची स्थितीतालुका                सरासरी                लागवड     क्षेत्र              झालेले क्षेत्रहवेली                   ९५९५                    १४२६मुळशी               १८२१                      ८३१भोर                    १४२५                       ६४५मावळ              १५६६                           ०वेल्हे                 २११.७                         ०जुन्नर               ९६५३                      २४५खेड                   २९२८                        ०आंबेगाव           ३८२७                       ३९८शिरूर             १८,५६९                   ६,७७५बारामती      १६,११७                     ३५३८इंदापूर         ३१,२०१                     १५९६दौंड              ३१,२६१                    ६,०६६पुरंदर         २४५६                        २२०२एकूण          १,३०,६३१               २३,७३०.....................* जिल्ह्यात रब्बी पिकाचे ऊसासह ५ लाख २२ हजार ५२७ हेक्टर क्षेत्र असून, पैकी ४१ हजार १५८ हेक्टरवरील पेरणी-लागवडीची कामे झाली आहेत. 

* ऊस पिक वगळून रब्बीचे क्षेत्र ३ लाख ९१ हजार ८९७ हेक्टर असून, १७ हजार ४२८ हेक्टरवर (४ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांचा समावेश आहे. 

* उसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३० हजार ६३१ हेक्टर असून, २३,७३० (१८ टक्के) हेक्टरवर लागवड झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस