शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Sugar factory : साखर उत्पादनात राज्याचा क्रमांक घसरणार; नेमकं कारण काय ?

By नितीन चौधरी | Updated: February 18, 2025 18:14 IST

राज्यात गेल्यावर्षी ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा त्यात २४ लाख टनांनी घट होऊन ते ८६ लाख टन होईल

पुणे यंदा ऊस गाळप हंगाम शेवटाकडे जात असून, देशभरात आतापर्यंत ७७, तर राज्यात ३० कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता केली आहे. देशात आतापर्यंत १९७.६५ लाख टन, तर राज्यात ६८.१० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षाशी तुलना केल्यास देशातील साखर उत्पादनात २७ लाख टन, तर राज्याच्या साखर उत्पादनात ११ लाख टनांनी घट झाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार देशात २७० लाख टन उत्पादन अपेक्षित असून, गेल्या वर्षाच्या ३१९ लाख टनांच्या तुलनेत त्यात ४९ लाख टन घट होऊ शकते. राज्यात गेल्यावर्षी ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा त्यात २४ लाख टनांनी घट होऊन ते ८६ लाख टन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे साखर उत्पादनात पहिला क्रमांक असलेला महाराष्ट्र यंदा दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे.देशातील एकूण ५३१ कारखान्यांपैकी ४५४ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. यंदा १५ फेब्रुवारीअखेर यापैकी ७७ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. देशभरात आतापर्यंत २ हजार १७५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर साखर उत्पादन १९७.६५ लाख टनापर्यंत झाले असून, गेल्यावर्षी याच तारखेला २२४.७५ लाख टन झाले आहे. यंदा त्यात २७.१० लाख टनांची घट झाली आहे. देशभरात सरासरी साखर उतारा केवळ ९.०९ टक्केच मिळाला असून, तो गेल्या ९.८७ टक्के होता. यंदा त्यात ०.७८ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा साखर उत्पादन २७० लाख टन राहण्याचा अंदाज असून, गेल्यावर्षीच्या ३१९ लाख टन साखरेच्या तुलनते त्यात सुमारे ४९ लाख टनांची घट येण्याची शक्यता असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.उत्तर प्रदेशातील ११९ कारखान्यांपैकी २ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून, ६८० लाख टन ऊस गाळपातून सरासरी ९.३० टक्के उताऱ्याने ६३.२५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. हंगामाअखेर सुमारे ९३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील २०० पैकी १७० कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असून ३० कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केला आहे. आतापर्यंत ७४० लाख टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी ९.२० टक्के उताऱ्याने ६८.१० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. हंगामाअखेर महाराष्ट्रातील साखर उत्पादन ८६ लाख टन होणार असून, महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज आहे. तसेच सुमारे ३७ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविली जाणार आहे.

स्थानिक बाजारातील विक्री दर समाधानकारक राहण्याची अपेक्षा असून, कारखान्यांना ऊस उत्पादकांची देणी भागविणे शक्य होईल. साखरेच्या किमान विक्री दरात तसेच साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीदरात वाढ झालेली नाही. ती झाल्यास कारखान्यांचे अर्थचक्र सुधारण्यास मदत होणार आहे. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस