शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

फी भरली नाही म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसविले; राजगुरूनगर मधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 2:35 PM

पालक वर्गाबरोबरच शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करत असून शाळेच्या या कारवाईचा निषेध केला जातोय

राजगुरुनगर: विद्यार्थ्यांनी चालू वर्षाची शैक्षणिक फी न भरल्यामुळे शाळेने पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून व्हांरड्यात बसवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेचा पहिला दिवस म्हणुन सर्व शाळा विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करतात. मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांचचे असे स्वागत झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 राजगुरुनगर मधील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या शेठ केशरचंद पारख या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुरूवारी दिनांक १५ रोजी प्रकार घडला. चालु वर्षाची शैक्षणिक फी या विद्यार्थ्यानी भरली नव्हती शाळेत सुमारे सातशे आठशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थी शाळेत आल्यावर फी भरणारे व न भरणारे यांची वर्गवारी करून फी भरणारांना वर्गात बसू दिले. बाकीच्यांना बाहेर काढण्यात आले. त्यातील काही मुले घरी गेली तर काही व्हरांडयात बसून राहिली. पहिला दिवस म्हणुन उत्साह आणि आनंदाने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून शाळेच्या व्हरांडयात बसवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे सोपान डुंबरे, नितीन ताठे यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर एक तासाने विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आले.

मागील तसेच चालु शैक्षणिक वर्षाची फी द्यावी म्हणुन पालकांना वारंवार सांगण्यात आले. मात्र शाळेची फी न मिळाल्याने पालकांना महिती द्यावी म्हणून काही वेळ विद्यार्थ्याना वर्गाबाहेर थांबवले होते. असे शालेय समितीकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे पालक वर्गाबरोबरच शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करत असून शाळेच्या या कारवाईचा निषेध करुन शिक्षण विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणTeacherशिक्षक