शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

विद्यार्थ्यांनो नुसते सायबर हमाल होऊन कार्यरत राहू नका : ज्ञानेश्वर मुळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:46 IST

सर्जनशीलता, सकारात्मकता आणि परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण तयार करून आपल्या देशातील बुध्दिमान युवकांनी परदेशात न जाता भारतात राहावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी चौकटीच्या बाहेरचा विचार केला तर त्यांना बाहेरच्या जगात लाखो संधीगतिशीलता आणि कनेक्टीव्हीटीचा आपल्या जगण्यावर खोलवर परिणाम

पुणे : केवळ भारताबाहेरच नोकरीच्या चांगल्या संधी आहेत असे नाही. या नोकऱ्या अत्याधुनिक, चकचकीत तसेच जास्त पैसे देणाऱ्या असल्या तरी त्या माध्यमातून दिमाखदार कारकून किंवा सायबर कुली (हमाल) बनू नका असे आवाहन भारताचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११३ पदवी प्रदान सोहळयातील दिक्षांत भाषण त्यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते.विद्यार्थ्यांना एकमेव्दितीय बना, जिज्ञासा बाळगा, बदलासाठी तयार रहा, नेतृत्त्व क्षमता बाळगा व दयाळूपणा अंगी रुजवा या पंचसुत्रीच्या आधारे ज्ञानेश्वर मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी वेगळया पध्दतीने विचार केला तर त्यांना बाहेरच्या जगात लाखो संधी दिसतील. पुणे शहराचे उदाहरण घेऊन विचार केला तरी खूप काही करता येण्यासारखे आहे. शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नद्यांना त्यांचे पूर्वीचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी काय करता येईल. शहरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळासाठी स्थानिक पातळीवर रोजगार कसा उपलब्ध करता येईल. शहराला सर्वात स्वच्छ शहर कसे बनविता येईल. शहराची वाहतूक समस्या कशी सोडवता येईल. वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सोयी सुविधा कशा पुरविता येईल अशा असंख्य प्रश्नांचा अभ्यास करूनन त्याची उत्तरे शोधता येतील.’’उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या आयुष्याच्या शोधात परदेशी जाणारे विद्यार्थी आपल्या देशाचा सहजपणे कायापालट करता येऊ शकेल या पर्यायांवर विचार करत नाही. देशात सर्जनशीलता, सकारात्मकता आणि परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण तयार करून आपल्या देशातील बुध्दिमान युवकांनी परदेशात न जाता भारतात राहावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मुळे यांनी सांगितले. सध्या आपण ज्या जगात राहत आहोत तिथे काहीच कायमस्वरूपी काहीच उरलेले नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सगळीकडे झगमगाट निर्माण झाला आहे. गतिशीलता आणि कनेक्टीव्हीटीचा आपल्या जगण्यावर खोलवर परिणाम झाला आहे.  डॉ. करमळकर यांनी गेल्या ६ महिन्यात विद्यापीठात राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व अन्य गोष्टींचा आढावा आपल्या भाषणामधून घेतला. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीjobनोकरीIndiaभारत