शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

विद्यार्थ्यांनो नुसते सायबर हमाल होऊन कार्यरत राहू नका : ज्ञानेश्वर मुळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:46 IST

सर्जनशीलता, सकारात्मकता आणि परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण तयार करून आपल्या देशातील बुध्दिमान युवकांनी परदेशात न जाता भारतात राहावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी चौकटीच्या बाहेरचा विचार केला तर त्यांना बाहेरच्या जगात लाखो संधीगतिशीलता आणि कनेक्टीव्हीटीचा आपल्या जगण्यावर खोलवर परिणाम

पुणे : केवळ भारताबाहेरच नोकरीच्या चांगल्या संधी आहेत असे नाही. या नोकऱ्या अत्याधुनिक, चकचकीत तसेच जास्त पैसे देणाऱ्या असल्या तरी त्या माध्यमातून दिमाखदार कारकून किंवा सायबर कुली (हमाल) बनू नका असे आवाहन भारताचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११३ पदवी प्रदान सोहळयातील दिक्षांत भाषण त्यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते.विद्यार्थ्यांना एकमेव्दितीय बना, जिज्ञासा बाळगा, बदलासाठी तयार रहा, नेतृत्त्व क्षमता बाळगा व दयाळूपणा अंगी रुजवा या पंचसुत्रीच्या आधारे ज्ञानेश्वर मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी वेगळया पध्दतीने विचार केला तर त्यांना बाहेरच्या जगात लाखो संधी दिसतील. पुणे शहराचे उदाहरण घेऊन विचार केला तरी खूप काही करता येण्यासारखे आहे. शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नद्यांना त्यांचे पूर्वीचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी काय करता येईल. शहरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळासाठी स्थानिक पातळीवर रोजगार कसा उपलब्ध करता येईल. शहराला सर्वात स्वच्छ शहर कसे बनविता येईल. शहराची वाहतूक समस्या कशी सोडवता येईल. वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सोयी सुविधा कशा पुरविता येईल अशा असंख्य प्रश्नांचा अभ्यास करूनन त्याची उत्तरे शोधता येतील.’’उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या आयुष्याच्या शोधात परदेशी जाणारे विद्यार्थी आपल्या देशाचा सहजपणे कायापालट करता येऊ शकेल या पर्यायांवर विचार करत नाही. देशात सर्जनशीलता, सकारात्मकता आणि परिवर्तनासाठी अनुकूल वातावरण तयार करून आपल्या देशातील बुध्दिमान युवकांनी परदेशात न जाता भारतात राहावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मुळे यांनी सांगितले. सध्या आपण ज्या जगात राहत आहोत तिथे काहीच कायमस्वरूपी काहीच उरलेले नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सगळीकडे झगमगाट निर्माण झाला आहे. गतिशीलता आणि कनेक्टीव्हीटीचा आपल्या जगण्यावर खोलवर परिणाम झाला आहे.  डॉ. करमळकर यांनी गेल्या ६ महिन्यात विद्यापीठात राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व अन्य गोष्टींचा आढावा आपल्या भाषणामधून घेतला. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीjobनोकरीIndiaभारत