शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

राज्यात दारुबंदीसाठी शिरूर ते मंत्रालय संघर्षयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 3:38 AM

वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरच्या धर्तीवर शासनाने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने पाच जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान शिरूर ते मंत्रालय, अशी संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे.

शिरूर : वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरच्या धर्तीवर शासनाने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने पाच जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान शिरूर ते मंत्रालय, अशी संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर १० जानेवारीपासून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालया समोर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिली.गेल्या वर्षी क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) पाचंगे यांनी तालुक्यात ९१ ग्रामपंचायतीत ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव घेण्यात आले. पंचायत समितीही या मोहिमेत सहभागी झाली. जिल्ह्यातही यामुळे १३०० ग्रामस्थांनी दारूबंदी व व्यसनमुक्तीचे ठराव केले. आता संपूर्ण राज्यात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी संघर्षयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.शासनाचे दारूबंदी व व्यसनमुक्ती धोरण पाहता तसेच जागतिक दारू पिण्याचे परिणाम पाहता राज्यातील बिअरबार, परमिटरूम तसेच दारू पिण्याचे प्रमाण बेकायदा असल्याचे पाचंगे यांनी उत्पादक शुल्क आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.जगभरात दारू पिण्याचे ठरवून दिलेले प्रमाण पाहता युनायटेड किंग्डम तसेच इतर देशांत अनुक्रमे १० ते १४ युनिट दर आठवडा असे आहे. राज्यात एका व्यक्तीला दर आठवडा १५०० मि.लि. दिलेले प्रमाण चुकीचे असल्याचे पाचंगे यांनी म्हटले आहे.शासनाने नागरिकांच्या मागणीनुसार त्या भागात दारूबंदी करावी तसेच ज्या तालुक्यातून (भागातून) दारूबंदीची मागणी नसेल तिथे तेथे मिलिमीटरप्रमाणे एकाच ठिकाणी पुरवठा केंद्र सुरू करावे, अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.मोक्का कायद्यांंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे. शासनाने गांभीर्याने न घेतल्यास कायदा हातात घेऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे.आपल्या देशाची संपत्ती युवकांना मानले जाते. मात्र व्यसनामुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे याच युवाशक्तीचा नाश होत चालला असून, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे. याला आळा बसण्यासाठी राज्यात दारूबंदी होणे आवश्यक आहे.- संजय पाचंगे,अध्यक्ष, क्रांतीवीर प्रतिष्ठान

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र