शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

मावळमधील जाधववाडी धरणात सहा जण बुडाले : तीन व्यक्तींचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 6:32 PM

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या  तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना  एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. 

पुणे :उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या  तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना  एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. 

याबाबत अधिक माहिती अशी की,प्रशील  अमोल आढाव  (वय ७ वर्षे) , अनिल  कोंडींबा कोळसे (वय ५८) , प्रितेश  रघुनाथ आगळे (वय ३२ ) तिघेही रा.घाटकोपर  मुंबई अशी मृतांची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार. खबर देणाऱ्या स्वप्नील दादासाहेब गायकवाड यांच्या घरी आलेले हे पाहुणे उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्त नवलाख उंब्रे गावच्या हद्दीतील  जाधववाडी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यातील काहीजण धरणाच्या पाण्यात उतरले. त्यात अचानक अनिल कोंडींबा कोळसे यांचा पाय घसरला. त्यावेळी त्यांनी  मागे उभे असलेल्या दादासाहेब पोपट गायकवाड, प्रशिल अमोल आढाव यांना पकडले. आणि  ते दोघेही पाण्यात पडले .त्यांना  वाचविण्यासाठी प्रितेश रघुनाथ आगळे यांनीही पाण्यात उडी मारली. त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संगीता दादासाहेब गायकवाड व उत्कर्ष दादा गायकवाडही बुडू लागल्याने नातेवाईकांनी  आरडाओरड केली.तो आवाज शेजारी असलेल्या एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी ऐकला. त्यांनी तात्काळ पाण्यात उडी घेत तिघांचे प्राण वाचवले मात्र उर्वरित तिघांना तळेगाव येथील जनरल हाॅस्पीटलमध्ये नेले असता त्यापूर्वीच मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणेmavalमावळDeathमृत्यू