शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

धक्कादायक ! महाराष्ट्रात ४ कोटी जनता व्यसनी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 19:22 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि पप्रगत राज्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात चार कोटी नागरिक व्यसनाच्या विळख्यात अडकल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. ही आकडेवारी धक्कादायक तर आहेच पण सामाजिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारीही आहे.

ठळक मुद्देव्यसनामुळे प्रतिवर्ष ४५ हजार कुटुंब उध्वस्त सरासरी कुटुंबातील एक व्यक्ती व्यसनाधीन

पुणे : देशातील प्रगतीपथावर चाललेल्या राज्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील एक तृतीयांश म्हणजे सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे निरीक्षण व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने नोंदवले आहे.दरवर्षी साडेतीन लाखांपेक्षा अधिक नागरिक दारू पिण्यामुळे मृत्यूला कवटाळत असून तब्बल ४५ हजार कुटुंब उध्वस्त होत आहेत. या संस्थेने केलेल्या ९८ गावांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार हे धक्कादायक निष्कर्ष  समोर आले आहे.या सर्वेक्षणात दारू व इतर उपलब्ध विविध व्यसनांच्या आधारावर प्रश्नावली तयार करण्यात आली होती. संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करता येईल अशा गावांचा अभ्यास करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. या सर्वेक्षणात दारू या व्यसनाच्या अनुषंगाने सुमारे १९ प्रश्न असलेली प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात लिहिण्यात लक्षात आलेले निष्कर्ष हे भविष्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे दिसून आले आहेत. व्यसन करण्यासाठी आर्थिक, सामाजिक परिस्थिती आणि मानसिक अवस्था जबाबदार असते. त्यामुळे परिस्थिती बदलण्याची सर्वाधिक गरज असल्याचे निदर्शनास आले आहे. या निरीक्षणात संपूर्ण राज्यात दारू, तंबाखू, गुटखा, तपकीर, खर्रा, सिगारेट, अफू, गांजा, ड्रग्ज, ताडी, माडी आदी वैध आणि अवैध प्रकारची व्यसने गल्लीबोळातही उपलब्ध आहेत. राज्याच्या १२कोटी लोकसंख्येपैकी ४ कोटी यक्ती कोणत्यातरी व्यसनात अडकलेले आहेत. प्रत्येक कुटुंबात एक व्यक्ती व्यसनाधीन आहे असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.तसेच ६०%नागरिक दारूमुळे भांडणे होत असल्याचे मान्य करत असल्याचेही मान्य केले असे ठळक मुद्दे नागरिकांनी मांडले आहेत.  व्यसनमुक्तीसाठी केवळ काम करणे आवश्यक नसून त्यामागे असणारी मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. याबाबत मागील दोन अधिवेशनांच्या काळात आंदोलने करण्यात आली असून राज्याच्या हिरकवर्षानिमित्त व्यसनमुक्ततेची संकल्पना राबवावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रalcohol prohibition actदारुबंदी कायदा