धक्कादायक! १९ वर्षीय युवतीने दत्त मंदिरात गळफास घेऊन केली आत्महत्या; खेडच्या राजगुरूनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 19:27 IST2021-08-20T19:27:50+5:302021-08-20T19:27:56+5:30
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहेत

धक्कादायक! १९ वर्षीय युवतीने दत्त मंदिरात गळफास घेऊन केली आत्महत्या; खेडच्या राजगुरूनगरमधील घटना
राजगुरुनगर : राजगुरूनगरमध्ये १९ वर्षीय युवतीने दत्त मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षदा अर्जुन वाळुंज (वय १९ रा वेताळे ता.खेड) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नांव आहे. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून मुलीचे वडील अर्जुन विठ्ठल वाळुंज यांनी खेड पोलिस ठाण्यात फीर्याद दिली आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, युवती व तिची बहिण वेताळे येथून राजगुरूनगर शहरात संगणकक्लास साठी येत होत्या. क्लास संपल्यानंतर दोघी बहिणी वेताळे येथे जाण्यासाठी एसटी बसस्थानकात आल्या. दरम्यान अक्षदा हि राजगुरुनगर शहरात जाऊन येते असे सांगून गेली. मात्र ४ तास वाट पाहूनही अक्षदा परत आली नाही. भिमानदी काठी नवीन पुलाजवळ दत्त मंदिरात लोखंडी अँगलला ओढणीने अक्षदा हिने फाशी घेतल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ओळख पटवून घरातील कुटुंबाला कळविले. आत्महत्या की हत्या यांचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षा राणी घाटे करित आहे.