शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

शरद पवार यांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते - दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 14:24 IST

राज्यातील सहकार कायद्यात बदल करण्यासाठी एक मसुदा तयार केला जात असून, यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा करणार

पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सहभागी झालेले सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राजीनामा देऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच रोखले. वळसे-पाटील यांनीच याबाबतचा गौप्यस्फोट केला. ' हा प्रश्न व्यक्तिगत आहे, पण मला काम करायला सांगितले ही गोष्ट खरी आहे,' असे त्यांनी सांगितले. आम्ही शरद पवार यांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते आहेत आणि राहतील, असेही त्यांनी संगितले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे आयोजित चर्चासत्राच्या निमित्ताने शरद पवार व वळसे-पाटील पहिल्यांदाच वसंतदादा शुगर इस्टिट्यूटमध्ये एकत्र आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना वळसे यांनी ही माहिती दिली. वळसे अजित पवार गटात गेल्यानंतर व्हीएसआयचे अध्यक्ष कोण होणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. त्यानुसार वळसे यांनी राजीनाम्याचा प्रस्तावही दिला होता. मात्र, शरद पवार यांनी तो फेटाळला. याबाबत शनिवारीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट केले होते. त्यानंतर वळसे यांनीही त्याला दुजोरा दिला. याचवेळी अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. याबाबत ते म्हणाले, “आज कोणतीही बैठक नव्हती. आज चर्चासत्र होते. यासाठी सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी उपस्थित होते. याचवेळी चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे लोकार्पण असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे उपस्थित होते, तर मी या चर्चासत्राला हजर होतो.” तर अजित पवार हे शरद पवार यांना टाळताहेत का असे विचारल्यावर हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारा असे सांगत जास्त बोलण्याचे टाळले. ' केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सहकार कायद्यात बदल करण्यासाठी एक मसुदा तयार केला जात असून, यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा करणार आहोत,' असेही त्यांनी नमूद केले.

मलिकांना आमच्यामुळे जामीन नाही

तुम्ही सत्तेत आले म्हणून नवाब मालिकांना जामीन मिळाला का, याबाबत ते म्हणाले, “नवाब मलिक बाहेर आले हा एक न्यायालयीन निर्णय आहे. आमच्या भूमिकेमुळे घडले असे म्हणणे चुकीचे आहे. ते कोणासोबत आहेत, याबाबत बोलणे आता अयोग्य आहे. बाहेर सुरू असणाऱ्या चर्चांना काही अर्थ नसतो.” चर्चासत्र पूर्णपणे अराजकीय स्वरूपाचे होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने ते आयोजित केले असल्याने कदाचित अजित पवार अनुपस्थित राहिले असावेत,' असे मत माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार