शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

शरद पवार यांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते - दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 14:24 IST

राज्यातील सहकार कायद्यात बदल करण्यासाठी एक मसुदा तयार केला जात असून, यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा करणार

पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सहभागी झालेले सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राजीनामा देऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच रोखले. वळसे-पाटील यांनीच याबाबतचा गौप्यस्फोट केला. ' हा प्रश्न व्यक्तिगत आहे, पण मला काम करायला सांगितले ही गोष्ट खरी आहे,' असे त्यांनी सांगितले. आम्ही शरद पवार यांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते आहेत आणि राहतील, असेही त्यांनी संगितले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे आयोजित चर्चासत्राच्या निमित्ताने शरद पवार व वळसे-पाटील पहिल्यांदाच वसंतदादा शुगर इस्टिट्यूटमध्ये एकत्र आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना वळसे यांनी ही माहिती दिली. वळसे अजित पवार गटात गेल्यानंतर व्हीएसआयचे अध्यक्ष कोण होणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. त्यानुसार वळसे यांनी राजीनाम्याचा प्रस्तावही दिला होता. मात्र, शरद पवार यांनी तो फेटाळला. याबाबत शनिवारीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट केले होते. त्यानंतर वळसे यांनीही त्याला दुजोरा दिला. याचवेळी अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. याबाबत ते म्हणाले, “आज कोणतीही बैठक नव्हती. आज चर्चासत्र होते. यासाठी सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी उपस्थित होते. याचवेळी चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे लोकार्पण असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे उपस्थित होते, तर मी या चर्चासत्राला हजर होतो.” तर अजित पवार हे शरद पवार यांना टाळताहेत का असे विचारल्यावर हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारा असे सांगत जास्त बोलण्याचे टाळले. ' केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सहकार कायद्यात बदल करण्यासाठी एक मसुदा तयार केला जात असून, यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा करणार आहोत,' असेही त्यांनी नमूद केले.

मलिकांना आमच्यामुळे जामीन नाही

तुम्ही सत्तेत आले म्हणून नवाब मालिकांना जामीन मिळाला का, याबाबत ते म्हणाले, “नवाब मलिक बाहेर आले हा एक न्यायालयीन निर्णय आहे. आमच्या भूमिकेमुळे घडले असे म्हणणे चुकीचे आहे. ते कोणासोबत आहेत, याबाबत बोलणे आता अयोग्य आहे. बाहेर सुरू असणाऱ्या चर्चांना काही अर्थ नसतो.” चर्चासत्र पूर्णपणे अराजकीय स्वरूपाचे होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने ते आयोजित केले असल्याने कदाचित अजित पवार अनुपस्थित राहिले असावेत,' असे मत माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार