शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

"संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर १२ हजार कोटी खर्च करणार" - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 14:03 IST

राज्याला आपण सर्वांनी मिळून देशात एक नंबरला घेऊन जायचं आहे

ठळक मुद्देसंपूर्ण राज्यातून संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीला जातात

पुणे : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भुमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. गडकरींनी पुण्यातील विकासाबाबतच्या मुद्द्यावर भाष्य केले. पेट्रोल, मेट्रो अशा प्रकल्पनाचा उल्लेख करताना विविध विषयावर चर्चा केली. महाराष्ट्रात आषाढी वारीला खूपच महत्व आहे. संपूर्ण राज्यातून संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीला जात असतात. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखी महामार्गाबद्दल त्यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. 

गडकरी म्हणाले, संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखी मार्गावर १२ हजार कोटी खर्च करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कामाची आखणी, रस्ता बांधणी, खर्चाच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. अजित दादांशी बोलून तो कार्यक्रम कुठं घ्यायचा ते आम्ही ठरवणार आहोत. असंही ते म्हणाले आहेत. 

''महाराष्ट्र राज्य विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर आहे. रस्ते, हायवे, मेट्रो, उड्डाणपुलासारखे प्रकल्प महाराष्ट्रात लवकरच पूर्ण होतील. राज्याला आपण सर्वानी मिळून देशात एक नंबरला घेऊन जायचं आहे असंही ते म्हणाले आहेत.'' 

नरीमन पॉइंट ते दिल्ली १२ तासांत

“अजित दादा, मी आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे बांधतोय. परवा मी त्याचं काम पाहिलं. एका ठिकाणी तो १२ लेन आहे. त्यावर १७० किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो. पण पोटातलं पाणी हललं नाही. त्याचं ७० टक्के काम झालं आहे. फक्त महाराष्ट्रातलं काम राहिलंय. या हायवेला मी जेएनपीटीपर्यंत नेणार आहे. माझी इच्छा होती की वसई-विरारपासून वरळी बांद्र्यापर्यंत हा मार्ग जोडला तर नरीमन पॉइंटवरून थेट दिल्लीला १२ तासांत पोहोचता येईल”, असं ते म्हणाले.

जिल्ह्यात मेट्रोचे जाळे वाढणार

पुण्यापासून कोल्हापूर, सोलापूर, बारामती, नगर, लोणावळा या मार्गावरील ब्रॉडगेजवर आठ डब्यांची मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमध्ये विमानासारखी सोय असणार आहे. याचे तिकीट एसटी बसएवढं असेल.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी