शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

‘राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा', संभाजी ब्रिगेडची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:52 IST

ठाकरेंनी चुकीचा इतिहास सांगितला- संभाजी ब्रिगेड

पुणे :औरंगाबादमधील सभेत शिवछत्रपतींच्या समाधीसंदर्भात चुकीचा इतिहास सांगितला, यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी व त्यांच्यावर यासाठी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर म्हणाले, औरंगाबादमधील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, असे सांगितले. आता खुद्द टिळक कुटुंबीयांनीच हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले. अशा प्रकारचा चुकीचा इतिहास सांगणे राजद्रोहच आहे. तो ठाकरे यांनी केला. त्यामुळे ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केलीय.

पुढे बोलताना पासलकर म्हणाले, शिवरायांच्या मृत्यूनंतर ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली. पेशवाईत समाधीकडे दुर्लक्ष झाले. महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन समाधीचा शोध घेतला. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले व तसे नियोजन केले. खरा इतिहास हा असा असतानाही राज यांनी चुकीच्या गोष्टी सांगितल्या.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसLokmanya Tilakलोकमान्य टिळकMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडा