शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

'आधी सुरक्षा मग परीक्षा' ; विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 11:56 PM

विद्यापीठाच्या काही अधिसभा सदस्यांचा परीक्षेला विरोध

ठळक मुद्देअंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सध्या दोन मत प्रवाह निर्माण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारी केली सुरू

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यापीठाच्या काही अधिसभा सदस्यांचा परीक्षेला विरोध आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये ‘आधी विद्यार्थ्यांची सुरक्षा मग परीक्षा’अशी भूमिका काही अधिसभा सदस्यांनी घेतली आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.परंतु,ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची आहे,त्यांना परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार आहे. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा होणार,असे पत्र राज्य शासनाला पाठविले.त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सध्या दोन मत प्रवाह निर्माण झाले आहेत.

परंतु,विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या लेखी निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सुध्दा शासनाच्या लेखी आदेशानुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळापैकी अधिसभेत विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक यांच्यातील प्रतिनिधी निवडून जातात. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला अधिसभेची मान्यता असणे गरजेची असते.त्यामुळेच परीक्षेबाबत अधिसभा सदस्यांची मते जाणून घेतली असता काही सदस्यांनी परीक्षेला स्पष्टपणे विरोध दर्शविला.सध्या विद्यार्थी आपापल्या गावी गेले असून त्यांची कौटुंबिक ,मानसिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे.तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत सुमारे 3 हजार 500 गुणांची परीक्षा दिली आहे.त्यामुळे केवळ 500 गुणांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणे योग्य आहे का? असा सवालही अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला.

-------------------प्रथम विद्यार्थ्यांची सुरक्षा मगच परीक्षेचा विचार केला पाहिजे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये,विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करावा. सध्या विद्यार्थ्यांच्या आजू-बाजूला कोरोना रूग्ण अढळून येत आहेत.तसेच पहिल्या वषार्पासून शेवटच्या वर्षापर्यंत मिळविलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी दिली जाते.पदवी मिळाल्यानंतर नोकरी मिळेलच याची कोणीही खात्री देत नाही.त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा घेऊ नये.- अमित पाटील,अधिसभा सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ--------------परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असून सध्या आपल्या गावी गेले आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शहरात बोलवल्यास त्यांचा राहण्याचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.त्यामुळे विद्यापीठाने अंतिम वषार्ची परीक्षा घेऊ नये.

- अभिषेख बोके,अधिसभा सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ------------विद्यापीठाच्या पुणे,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील किती विद्यार्थी इतर जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर आहेत.याबाबतची माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे सुमारे 90 टक्के विद्यार्थी हे प्रवास करतात. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलवून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षेचा अट्टहास धरू नये.

- प्रा. के.एल.गिरमकर ,अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयPune universityपुणे विद्यापीठ