शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

RPF: ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’, आरपीएफकडून ३ महिन्यांत ४०८ मुलांची सुटका

By नितीश गोवंडे | Updated: July 21, 2023 20:07 IST

किरकोळ भांडणामुळे, अथवा अन्य कौटुंबिक समस्यांमुळे मुले कुटुंबियांना न कळवता परस्पर निघून आल्याचे समोर आले

पुणे : रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मुलांना वाचवण्याचीही जबाबदारी ते पार पाडतात. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) ४०८ मुलांची सुटका केली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानक, तसेच प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांनी ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत या कामाला प्राधान्य दिले. या ४०८ मुलांमध्ये ३१८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलांचा पालकांशी संपर्क करून देण्यात आला.

घरातील किरकोळ भांडणामुळे, अथवा अन्य कौटुंबिक समस्यांमुळे तसेच काहीजण चांगले जीवन आणि शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न कळवता परस्पर निघून आल्याचे समोर आले. रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि मुलांना पालकांशी पुन्हा, बोलण्याचा, भेटण्याचा सल्ला देतात.

एप्रिल ते जून दरम्यानची विभागनिहाय आकडेवारी..

- पुणे विभागाने १३८ मुलांची सुटका केली असून त्यात सर्व मुलांचाच समावेश आहे.- मुंबई विभागाने ९२ मुलांची सुटका केली, त्यात ५८ मुले आणि ३४ मुलींचा समावेश आहे.- भुसावळ विभागाने ९४ मुले आणि २५ मुलींचा समावेश असलेल्या ११९ मुलांची सुटका केली.- नागपूर विभागाने ४० मुलांची सुटका केली असून त्यात २१ मुले आणि १९ मुलींचा समावेश आहे.- सोलापूर विभागाने १९ मुलांची सुटका केली असून यामध्ये ७ मुले आणि १२ मुलींचा समावेश आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेPoliceपोलिसFamilyपरिवारSocialसामाजिक