शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अंतिम वर्षाच्या परीक्षेवर शिक्षण क्षेत्रातील प्रमुख घटक मांडणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 19:50 IST

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

ठळक मुद्देप्राचार्य,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना येणार एकत्र

पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या विषयाला सध्या राजकीय रंग चढला असून परीक्षा होणार किंवा नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.मात्र, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यावर आपली एकत्रित भूमिका स्पष्ट करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत ,याबाबत शैक्षणिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या हालचालीमुळे या विषयाला राजकीय रंग चढल्याचे दिसून येत आहे.परंतु,यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, प्राचार्य महासंघ, एम.फुक्टो (प्राध्यापक संघटना) व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अराजकीय संघटनांनी यावर एकत्रितपणे भूमिका मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत गेल्या काही दिवसांपासून जाहीर केल्या जात असलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मात्र, परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा निकाल जाहीरकरण्याचे काम प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केले जाते. या घटकांना विश्वासात घेतल्याशिवाय परीक्षा घेण्याची व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.मात्र, विविध राजकीय पक्षांकडून परीक्षांबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षेवर जाहीर केलेल्या निर्णयानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल,असे राज्य शासनाला नुकतेच कळविले. त्यामुळे अधिकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.-------------------सध्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे व निकाल जाहीर करणे, याबाबत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांनी बोलले पाहिजे.  संस्थाचालक, प्राचार्य ,प्राध्यापक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन परीक्षांसंदर्भात काय करावे ? याबाबत एका व्यासपीठावर येऊन शासन व समाजासमोर वेगवेगळे पर्याय ठेवले पाहिजेत.प्राचार्य संघटनेतर्फे त्यादृष्टीने पुढाकार घेतला जाईल.- प्रा.नंदकुमार निकम,अध्यक्ष,प्राचार्य महासंघ, ------------ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देता शिक्षण क्षेत्रातील घटकांनी कायद्याच्या चौकटीत बसणारे परीक्षासंदर्भातील पर्याय शासन व समाजासमोर ठेवले पाहिजेत, यात कुठलेही दुमत नाही. त्यामुळे प्राध्यापक संघटनेतर्फे यावर अभ्यासपूर्ण  भूमिका मांडली जाईल. - प्रा.एस.पी. लवांडे, सचिव, एम.फुक्टो----------------------परीक्षांबाबत राजकारण न करता विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला हवा. विद्यार्थ्यांशिवाय इतर कोणत्याही घटकांना अर्थ नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.

-  विजय निकम ,अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय