शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफच्या २६ पथकांद्वारे बचावकार्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनानुसार तसेच स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार आम्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनानुसार तसेच स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार आम्ही पथके पाठवले आहेत. सध्या ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २६ पथकांद्वारे बचाव कार्य सुरू आहे. पाण्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असले तरी आमची पथके प्रत्येक ठिकाणी पोहचली आहे, अशी माहिती एनडीआरएफच्या ५ व्या बटालीयनचे कमांडन्ट अनुपम श्रीवास्तव यांनी लोकमतला दिली.

राज्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती झाली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, राजगड जिल्ह्यात परिस्थिती बिटक झाली आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार आम्ही आमची पथके ही रवाना केली आहे. काही पथके ही घटनास्थळी पोहचली असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. महाडमध्ये रस्त्यावर पडलेली झाडी तसेच वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे थोड्या अडचणी आल्या. मात्र, बोटीच्या साह्याने पथक पोहचले आहे. बचावकार्य वाढवण्यासाठी भुवनेश्वरून आणखी पथके मागवण्यात आली आहे. यातील चार पथके विमानाने पुण्यात उतरली आहे. तर दोन पथके गोव्याला आणि दोन पथके रत्नागिरिला पोहचली आहे. ती रवाना झाली असून त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणी काही वेळात ती पोहचणार आहे. सध्या पालघर येथे १, ठाणे येथे २, रायगड येथे १, महाड येथे ४, कोल्हापुर येथे २, मुंबई येथे ४ पथके तैनात करण्यात आली आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.