शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

एनडीआरएफच्या २६ पथकांद्वारे बचावकार्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनानुसार तसेच स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार आम्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनानुसार तसेच स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार आम्ही पथके पाठवले आहेत. सध्या ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २६ पथकांद्वारे बचाव कार्य सुरू आहे. पाण्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असले तरी आमची पथके प्रत्येक ठिकाणी पोहचली आहे, अशी माहिती एनडीआरएफच्या ५ व्या बटालीयनचे कमांडन्ट अनुपम श्रीवास्तव यांनी लोकमतला दिली.

राज्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती झाली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, राजगड जिल्ह्यात परिस्थिती बिटक झाली आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार आम्ही आमची पथके ही रवाना केली आहे. काही पथके ही घटनास्थळी पोहचली असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. महाडमध्ये रस्त्यावर पडलेली झाडी तसेच वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे थोड्या अडचणी आल्या. मात्र, बोटीच्या साह्याने पथक पोहचले आहे. बचावकार्य वाढवण्यासाठी भुवनेश्वरून आणखी पथके मागवण्यात आली आहे. यातील चार पथके विमानाने पुण्यात उतरली आहे. तर दोन पथके गोव्याला आणि दोन पथके रत्नागिरिला पोहचली आहे. ती रवाना झाली असून त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणी काही वेळात ती पोहचणार आहे. सध्या पालघर येथे १, ठाणे येथे २, रायगड येथे १, महाड येथे ४, कोल्हापुर येथे २, मुंबई येथे ४ पथके तैनात करण्यात आली आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.