शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुळशीतील अग्नितांडवात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 11:20 IST

नातेवाईक आणि संघटनेच्या काही मागण्या, कंपनीत दुपारच्या वेळेस लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू

ठळक मुद्दे प्रशासनाकडून आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबद्दल अजून काही पाऊल उचलले नाही

पुणे: मुळशीतील SVS अक्वा कंपनीमध्ये लागलेल्या आगीत मालकाच्या हलगर्जीपणामुळे कष्टकरी कामगारांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत त्या कामगारांचे कुटुंब निराधार झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबद्दल अजून काही पाऊल उचलले नाही. त्याबरोबरच आणखी मागण्याही पूर्ण कराव्यात. अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा इशारा मृतांचे नातेवाईक आणि मुळशी भागातील संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

कंपनीत दुपारच्या वेळेस लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये १५ स्त्रिया आणि 3 पुरुषांचा समावेश होता. तेव्हा कंपनीचे मालक निकुंज शहा व गौरव शहा यांच्याकडे सुरक्षेसाठी लागणारे कोणतेही साधन नव्हते. त्यांचा हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला आहे. 

सोमवारच्या दुर्घटनेनंतर प्रवीण तरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कंपनीला मुळशी पॅटर्न दाखवण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांनीही डीएनए आणि ब्लड सॅम्पलचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. संबंधित शासकीय यंत्रणेला त्यांच्या जबाबदारीबाबत खुलासा मागितला आहे. असे नातेवाईकांनी यावेळी सांगितले.

 नातेवाईकांच्या प्रमूख मागण्या 

- प्रत्येक मृत कुटुंबातील वारसांना २५ लाख रुपये द्यावेत - मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी - प्रत्येक मृत व्यक्तीच्या घरातील एकाला  कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. - जबाबदारी आणि कर्तव्यात कुचराई करणारी एमआयडीसी तसेच प्रदूषण मंडळ सारख्या  शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आरोपी करावे.

 

टॅग्स :PuneपुणेpirangutपिरंगुटMIDCएमआयडीसीfireआगPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी