शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

मुळशीतील अग्नितांडवात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 11:20 IST

नातेवाईक आणि संघटनेच्या काही मागण्या, कंपनीत दुपारच्या वेळेस लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू

ठळक मुद्दे प्रशासनाकडून आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबद्दल अजून काही पाऊल उचलले नाही

पुणे: मुळशीतील SVS अक्वा कंपनीमध्ये लागलेल्या आगीत मालकाच्या हलगर्जीपणामुळे कष्टकरी कामगारांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत त्या कामगारांचे कुटुंब निराधार झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबद्दल अजून काही पाऊल उचलले नाही. त्याबरोबरच आणखी मागण्याही पूर्ण कराव्यात. अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा इशारा मृतांचे नातेवाईक आणि मुळशी भागातील संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

कंपनीत दुपारच्या वेळेस लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये १५ स्त्रिया आणि 3 पुरुषांचा समावेश होता. तेव्हा कंपनीचे मालक निकुंज शहा व गौरव शहा यांच्याकडे सुरक्षेसाठी लागणारे कोणतेही साधन नव्हते. त्यांचा हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला आहे. 

सोमवारच्या दुर्घटनेनंतर प्रवीण तरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कंपनीला मुळशी पॅटर्न दाखवण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांनीही डीएनए आणि ब्लड सॅम्पलचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. संबंधित शासकीय यंत्रणेला त्यांच्या जबाबदारीबाबत खुलासा मागितला आहे. असे नातेवाईकांनी यावेळी सांगितले.

 नातेवाईकांच्या प्रमूख मागण्या 

- प्रत्येक मृत कुटुंबातील वारसांना २५ लाख रुपये द्यावेत - मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी - प्रत्येक मृत व्यक्तीच्या घरातील एकाला  कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. - जबाबदारी आणि कर्तव्यात कुचराई करणारी एमआयडीसी तसेच प्रदूषण मंडळ सारख्या  शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आरोपी करावे.

 

टॅग्स :PuneपुणेpirangutपिरंगुटMIDCएमआयडीसीfireआगPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी