शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
3
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
4
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
5
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
6
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
7
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
8
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
9
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
10
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
11
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
12
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
13
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
14
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
15
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
16
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
17
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
18
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
19
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
20
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी; झेंडू, चवळी, फ्लॉवर व फरसबीचे प्रचंड नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:09 IST

- झेंडू, चवळी, फ्लॉवर आणि फरसबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.

ओतूर : माळशेज परिसरातील ओतूर येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांवर सततच्या रिमझिम पावसाने आणि मधेच येणाऱ्या धुक्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः झेंडू, चवळी, फ्लॉवर आणि फरसबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.

ओतूर येथील शेतकरी मनोज गोपाळ डुंबरे यांच्या शेतातील सुमारे एक एकर झेंडू, ३० गुंठे चवळी, ३० गुंठे फ्लॉवर आणि ३० गुंठे फरसबी या पिकांचे जवळपास पूर्ण नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे आणि धुक्यामुळे पिके जमिनीतच कुजून गेली आहेत. लागवडीपासून रात्रंदिवस मेहनत घेऊन उभे केलेले पीक आता उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. माळशेज परिसरातील अनेक शेतकऱ्यांची अशीच अवस्था झाली असून, त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

गोगलगायींचा उपद्रव आणि पावसाचा दणका  

याआधी संथ गतीने पडणाऱ्या पावसामुळे शेतात गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला होता. या गोगलगायींनी तब्बल ८० टक्के पीक नष्ट केले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि आर्थिक जुळवाजुळव करून पुन्हा लागवड केली होती. नव्या पिकातून काही उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांनी बाळगली होती. मात्र, सततच्या पावसाने त्यांचे हे स्वप्नही भंगले. पावसाने हाताशी आलेले सोन्यासारखे पीक हिरावून घेतले आहे. 

दिवाळीच्या आनंदावर काळोख 

दिवाळी हा सण शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा असतो, कारण या काळात झेंडूसारख्या फुलांच्या पिकांना बाजारात मोठी मागणी असते. मात्र, यंदा पावसाने शेतकऱ्यांच्या या आनंदावर पाणी फेरले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत सापडले आहेत. "सण-वार आनंदाने साजरा करायचा की कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, याच चिंतेत आम्ही आहोत," असे मनोज डुंबरे यांनी सांगितले. परिसरातील इतर शेतकऱ्यांचीही हीच व्यथा आहे. 

शेतकऱ्यांचे आव्हान आणि अपेक्षा 

शेतकऱ्यांना सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे आर्थिक अडचणी. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, भांडवल जमा करून पिकांची लागवड केली होती. मात्र, आता उत्पन्नाऐवजी नुकसानच पदरी पडले आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडून तातडीने नुकसानभरपाई आणि आर्थिक मदतीची मागणी केली आहे. "आम्हाला तातडीने मदत मिळाली नाही, तर पुढील हंगामासाठी लागवड करणेही कठीण होईल," असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. माळशेज परिसरातील शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेले नुकसान हे केवळ आर्थिक नुकसान नसून, त्यांच्या मेहनतीवर आणि आशांवर झालेला आघात आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने पाऊले उचलून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा, येत्या काळात शेतकऱ्यांचे संकट आणखी गडद होण्याची भीती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rain Ruins Farmers' Efforts: Marigold, Beans, Cauliflower Crops Damaged

Web Summary : Persistent rain and fog in Malshej have devastated farmers. Marigold, beans, cauliflower, and French beans crops suffered major losses. Farmers face financial hardship before Diwali as crops rot, dashing hopes and livelihoods.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड