शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दिलासा; पेरण्यांना वेग!

By admin | Updated: July 7, 2014 22:59 IST

यवत व परिसरातील कासुर्डी, खोर, चौफुला आदी गावांमधे आज (दि.7) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली .

यवत : यवत व परिसरातील कासुर्डी, खोर, चौफुला आदी गावांमधे आज (दि.7) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली .
मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने चिंतित झालेल्या शेतकरी वर्गाला आजच्या पावसाने दिलासा मिळाला. तसेच, मागील दोन दिवसांपासून प्रचंड उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा आनंद  घेता आला. कालपयर्ंत कधी तरी ढगाळ वातावरण अन्यथा उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, आज अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसास सुरुवात झाली.
सुमारे पाऊण तास 
जोरदार एकसारखा पाऊस पडत होता. यामुळे परिसरातील रस्त्यावर पाणी साचले, तर नाल्यांमधूनही  
पाणी वाहिले. 
केवळ पाऊण तासाच्या काळात जोरदार झालेल्या पावसाने शेतातील स:या भरल्या होत्या. उसाचे पीक लांबलेल्या पावसाने अडचणीत आले होते, पण आजच्या पावसाने उसाला काही दिवस जीवदान मिळाले आहे . आता असाच पाऊस होऊ दे आणि दुष्काळ हटू दे, अशी प्रार्थना यवतकरांनी केली. (वार्ताहर)
 
4  सर्वच विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावल्याने शेतकरीवर्ग उसाचे पीक वाचविण्यासाठी प्रय}ाची पराकाष्टा करत होते. मात्र, परिसरातील सर्वच पाण्याचे स्नेत संपत चालले होते आणि धरण परिसरातही पाऊस नसल्याने मुळामुठा उजवा कालव्यातून पाणी सुटण्याची शक्यताही मावळली होती. त्यामुळे आजचा पाऊस यवत परिसरातील शेतीला जीवदान देणारा ठरला आहे.
 
सोमेश्वरनगर : आज दुपारी तीन वाजता सोमेश्वरनगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, या पावसावर पेरण्या होणार नाहीत. त्यासाठी अजूनही दमदार पावसाची आवश्यता आहे.  मृग नक्षत्र पूर्ण कोरडे गेल्याने जिरायती भागातील पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत. हा पडणारा अवकाळी पाऊस तात्पुरता आहे. बळीराजाला पेरण्यासाठी नक्षत्रंच्या पावसाची आवश्यता आहे. 
7 जुलै उजाडला, तरीही धरणो अजून कोरडीच आहेत. त्यामुळे दुष्काळाचे सावट अजून गडद होत चालले आहे. सध्या नीरा देवघरमध्ये 1.72 टक्के , भाटघरमध्ये 2.73 टक्के, तर वीरमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.   
नीरा देवघर, भाटघर व वीर धरणातील पाणीसाठे संपले आहेत. गेल्या महिनाभरात धरण क्षेत्रत पाऊस पडलाच नाही. जून महिना संपत आला, तरीही धरण क्षेत्रत पावसाचा एक थेंबही न पडल्याने धरणातील साठे संपले आहेत. जुलै महिना चालू झाला, तरीही पाऊस काही पडेना. पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतक:यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पाऊस कधी पडणार व पेरण्या कधी होणार, याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पेरण्यांसाठी हा पाऊस पुरेसा नाही. अजून जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
ओढे, नाले, तळी, विहिरी, बोअरवेल, नदी यामधील पाणीसाठे आता संपले आहेत. जिरायती भागातील काही गावांत तर आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्र गंभीर बनत चालला आहे. हवामान बदलाचा परिणाम होऊन मॉन्सूनची गती मंदावल्याने शेतक:याला अजून काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे.  गेल्या वर्षी या दिवसात धरणक्षेत्रत चांगला पाऊस चालू होता. (वार्ताहर)
 
माळेगाव : येथे रविवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी साधारणत: दीड तास पडत होता. त्यामुळे काही प्रमाणात शेतात उभ्या असणा:या पिकांना जीवदान मिळाले आहे. साधरणत: 1.3क् तास पडत होता. या पावसाने शेतक:यांच्या शेतातील उभी पिकांना जीवदान मिळाले. तसेच कारखान्याचा लागणी हंगामासाठी ऊसाचे बेणो शेतात लावणोसाठी व मशागतीसाठी शेतक:यांची लगबग सुरू झाली आहे. 
 
कवठे येमाई : महिनाभरापासून संपूर्ण राज्यात दडी मारलेल्या पावसाने अचानकपणो हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. अचानक आलेल्या पावसाने खरीप पेरणीसाठी वाट पाहणारा शेतकरी आज काही अंशी सुखावला.
शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. मलठण, कवठे येमाई, सविंदणो या भागाबरोबर कान्हूर मेसाई परिसरात दर वर्षी मूग पेरणी मोठय़ा प्रमाणात केली जाते. मात्र, या वर्षी मृग, आद्र्र नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतक:यांनी पेरणीपूर्व शेतीची केलेली मशागत तशीच पडून होती. कवठे येमाई मधील काही परिसरात शेतक:यांनी डिंभा उजवा कालव्याच्या पाण्याने शेत ओले करून बाजरीची पेरणी केली होती. आज झालेल्या पावसामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मात्र, आज अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पावसाने झोडपले. (वार्ताहर)
 
4शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात आज झालेल्या पावसामुळे फळबागांना जीवदान मिळाले आहे. मुगाच्या पेरण्या मात्र होण्याच्या आशा उरल्या नाहीत.  कवठे येमाई परिसरातील 237क् हेक्टरला या पावसाचा दिलासा मिळणार आहे. येथील  मुंजाळवाडी , इचकेवाडी ,सविंदने, कान्हूर, मिडगुलवाडी, चिंचोली मोराची, शास्ताबाद , मलठण   , लाखेवाडी या गावांतील पेरण्यांना वेग येणार आहे. 
 
निमगाव केतकी :   निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे सोमवारी रिमङिाम पाऊस झाला. त्यामुळे शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाणी प्रश्न मार्गी लागण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून निमगाव केतकी परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. पावसाअभावी पानवेली, डाळींब बरोबरच मिर्ची, वांगी, टोमॅटो, केळी  पिके अडचणीत आली आहेत. या पिकांना आजच्या पावसाने दिलासा मिळाला आहे.