शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दिलासा, पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाई दूर; टँकरने पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:49 IST

पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

- भरत निगडेनीरा - वळीव आणि मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुरंदर तालुक्यातील टंचाई संपली. मे अखेर तालुक्यात २८०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे मे महिना अखेरीस टँकर बंद झाले आहेत. यावर्षी एप्रिल मे महिन्यात तालुक्यात १८ गावे आणि १३ वाड्या तहानलेल्या होत्या. पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच्या उन्हाळ्यातील मे महिन्यात प्रथमच तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

पुरंदर तालुक्यात दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्यादरम्यान तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे लोकांना आणि जनावरांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षीही मे महिन्याच्या मध्यापर्यंत १८ गावे आणि १३ वाड्यांच्या लोकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तसेच काही भागांमध्ये विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. पण, वळवाचा व नंतर मान्सूनपूर्व पाऊस धुवाधार पडल्याने तालुक्यातील सर्वच टँकर मे महिन्यातच बंद झाले. पुरंदरच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.

पुरंदर तालुक्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान पाऊस पडतो. दक्षिण पूर्व भागातील वाल्हे, राख, नावळी, कर्नलवाडी, गुळूंचे, थोपटेवाडी, पिंपरे या गावातील पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, पूर, पोखर, नारायणपूर, पुरंदर किल्ल्याच्या परिसर व घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीही दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर पाणीटंचाई वाढते. त्यामुळे दक्षिण पूर्व पट्ट्यासह घाटमाथ्यावर टंचाई निवारणासाठी पाऊस पडेपर्यंत म्हणजे जून महिन्याच्या अखेरपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जादा पाऊस पडणाऱ्या भागातही टंचाई जाणवते, त्यामुळे तेथेही पाणीपुरवठा करावा लागतो.

मागील वर्षी (२०२४) सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला होता. तरीही एप्रिल महिन्यात पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व भागातील राख ग्रामपंचायत हद्दीतील रणनवरेवाडी, चव्हाण वस्ती, पडळकर वस्ती, करे वस्ती, नावळी ग्रामपंचायत हद्दीतील सोनवणे वस्ती, वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बहिर्जीचीवाडी, बाळाजीचीवाडी, वडाचीवाडी, गायकडवाडी, आंबाजीचीवाडी, मुकादमवाडी आदी वाड्यावस्त्यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, आता मागील पंधरा दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे तालुक्यातील टँकर पूर्णपणे बंद झाले आहेत.

पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी

पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हे पाणी गाळून उकळून प्यावे लागत आहे. तर, काहींनी इतर कामासाठी हे पाणी वापरून पिण्यासाठी जारचे पाणी विकत घेणे कायम ठेवले आहे.

एप्रिलमध्ये २० टँकरने पाणीपुरवठा

मागील वर्षी (सन २०२४) एप्रिल-मेमध्ये पुरंदरच्या २० गावठाणांसह १९३ वाड्यावस्त्यांतील ५७ हजार २९१ लोकसंख्येला ४२ टॅंकरने पाणीपुरवठा केला गेला होता. यावर्षी (सन २०२५) एप्रिल-मेमध्ये १८ गावातील वाड्यावस्त्यातील २४ हजार ९४१ लोकसंख्या आणि ४३ हजार २०० पशुधनासाठी २० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. मोरगाव योजना नाझरे धरणातून २० टँकर भरले जात होते. दररोज ६५ खेपा होत होत्या.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रwater shortageपाणीकपात