शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

पावसाचा दिलासा, पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाई दूर; टँकरने पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:49 IST

पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

- भरत निगडेनीरा - वळीव आणि मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुरंदर तालुक्यातील टंचाई संपली. मे अखेर तालुक्यात २८०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे मे महिना अखेरीस टँकर बंद झाले आहेत. यावर्षी एप्रिल मे महिन्यात तालुक्यात १८ गावे आणि १३ वाड्या तहानलेल्या होत्या. पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच्या उन्हाळ्यातील मे महिन्यात प्रथमच तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

पुरंदर तालुक्यात दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्यादरम्यान तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे लोकांना आणि जनावरांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षीही मे महिन्याच्या मध्यापर्यंत १८ गावे आणि १३ वाड्यांच्या लोकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तसेच काही भागांमध्ये विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. पण, वळवाचा व नंतर मान्सूनपूर्व पाऊस धुवाधार पडल्याने तालुक्यातील सर्वच टँकर मे महिन्यातच बंद झाले. पुरंदरच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.

पुरंदर तालुक्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान पाऊस पडतो. दक्षिण पूर्व भागातील वाल्हे, राख, नावळी, कर्नलवाडी, गुळूंचे, थोपटेवाडी, पिंपरे या गावातील पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, पूर, पोखर, नारायणपूर, पुरंदर किल्ल्याच्या परिसर व घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीही दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर पाणीटंचाई वाढते. त्यामुळे दक्षिण पूर्व पट्ट्यासह घाटमाथ्यावर टंचाई निवारणासाठी पाऊस पडेपर्यंत म्हणजे जून महिन्याच्या अखेरपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जादा पाऊस पडणाऱ्या भागातही टंचाई जाणवते, त्यामुळे तेथेही पाणीपुरवठा करावा लागतो.

मागील वर्षी (२०२४) सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला होता. तरीही एप्रिल महिन्यात पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व भागातील राख ग्रामपंचायत हद्दीतील रणनवरेवाडी, चव्हाण वस्ती, पडळकर वस्ती, करे वस्ती, नावळी ग्रामपंचायत हद्दीतील सोनवणे वस्ती, वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बहिर्जीचीवाडी, बाळाजीचीवाडी, वडाचीवाडी, गायकडवाडी, आंबाजीचीवाडी, मुकादमवाडी आदी वाड्यावस्त्यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, आता मागील पंधरा दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे तालुक्यातील टँकर पूर्णपणे बंद झाले आहेत.

पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी

पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हे पाणी गाळून उकळून प्यावे लागत आहे. तर, काहींनी इतर कामासाठी हे पाणी वापरून पिण्यासाठी जारचे पाणी विकत घेणे कायम ठेवले आहे.

एप्रिलमध्ये २० टँकरने पाणीपुरवठा

मागील वर्षी (सन २०२४) एप्रिल-मेमध्ये पुरंदरच्या २० गावठाणांसह १९३ वाड्यावस्त्यांतील ५७ हजार २९१ लोकसंख्येला ४२ टॅंकरने पाणीपुरवठा केला गेला होता. यावर्षी (सन २०२५) एप्रिल-मेमध्ये १८ गावातील वाड्यावस्त्यातील २४ हजार ९४१ लोकसंख्या आणि ४३ हजार २०० पशुधनासाठी २० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. मोरगाव योजना नाझरे धरणातून २० टँकर भरले जात होते. दररोज ६५ खेपा होत होत्या.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रwater shortageपाणीकपात