शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पावसाचा दिलासा, पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाई दूर; टँकरने पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:49 IST

पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

- भरत निगडेनीरा - वळीव आणि मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुरंदर तालुक्यातील टंचाई संपली. मे अखेर तालुक्यात २८०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे मे महिना अखेरीस टँकर बंद झाले आहेत. यावर्षी एप्रिल मे महिन्यात तालुक्यात १८ गावे आणि १३ वाड्या तहानलेल्या होत्या. पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच्या उन्हाळ्यातील मे महिन्यात प्रथमच तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

पुरंदर तालुक्यात दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्यादरम्यान तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे लोकांना आणि जनावरांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षीही मे महिन्याच्या मध्यापर्यंत १८ गावे आणि १३ वाड्यांच्या लोकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तसेच काही भागांमध्ये विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. पण, वळवाचा व नंतर मान्सूनपूर्व पाऊस धुवाधार पडल्याने तालुक्यातील सर्वच टँकर मे महिन्यातच बंद झाले. पुरंदरच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.

पुरंदर तालुक्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान पाऊस पडतो. दक्षिण पूर्व भागातील वाल्हे, राख, नावळी, कर्नलवाडी, गुळूंचे, थोपटेवाडी, पिंपरे या गावातील पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, पूर, पोखर, नारायणपूर, पुरंदर किल्ल्याच्या परिसर व घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीही दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर पाणीटंचाई वाढते. त्यामुळे दक्षिण पूर्व पट्ट्यासह घाटमाथ्यावर टंचाई निवारणासाठी पाऊस पडेपर्यंत म्हणजे जून महिन्याच्या अखेरपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जादा पाऊस पडणाऱ्या भागातही टंचाई जाणवते, त्यामुळे तेथेही पाणीपुरवठा करावा लागतो.

मागील वर्षी (२०२४) सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला होता. तरीही एप्रिल महिन्यात पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व भागातील राख ग्रामपंचायत हद्दीतील रणनवरेवाडी, चव्हाण वस्ती, पडळकर वस्ती, करे वस्ती, नावळी ग्रामपंचायत हद्दीतील सोनवणे वस्ती, वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बहिर्जीचीवाडी, बाळाजीचीवाडी, वडाचीवाडी, गायकडवाडी, आंबाजीचीवाडी, मुकादमवाडी आदी वाड्यावस्त्यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, आता मागील पंधरा दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे तालुक्यातील टँकर पूर्णपणे बंद झाले आहेत.

पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी

पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हे पाणी गाळून उकळून प्यावे लागत आहे. तर, काहींनी इतर कामासाठी हे पाणी वापरून पिण्यासाठी जारचे पाणी विकत घेणे कायम ठेवले आहे.

एप्रिलमध्ये २० टँकरने पाणीपुरवठा

मागील वर्षी (सन २०२४) एप्रिल-मेमध्ये पुरंदरच्या २० गावठाणांसह १९३ वाड्यावस्त्यांतील ५७ हजार २९१ लोकसंख्येला ४२ टॅंकरने पाणीपुरवठा केला गेला होता. यावर्षी (सन २०२५) एप्रिल-मेमध्ये १८ गावातील वाड्यावस्त्यातील २४ हजार ९४१ लोकसंख्या आणि ४३ हजार २०० पशुधनासाठी २० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. मोरगाव योजना नाझरे धरणातून २० टँकर भरले जात होते. दररोज ६५ खेपा होत होत्या.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रwater shortageपाणीकपात