शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

पुरंदर उपसा योजना खोळंबली, शेतकरी आला अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 2:46 AM

दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणा-या पुरंदर उपसा जलसिंचन योजना सध्या पुरेशी मागणी असूनही दर निश्चित केले नसल्याने शासनाच्या १९% दराचे पाणी सोडण्यात ही योजना खोळंबली आहे.

भुलेश्वर  - दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणाºया पुरंदर उपसा जलसिंचन योजना सध्या पुरेशी मागणी असूनही दर निश्चित केले नसल्याने शासनाच्या १९% दराचे पाणी सोडण्यात ही योजना खोळंबली आहे.राज्यातील बहुतांशी योजना वीजबिलापोटी बंद आहेत. सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येत आहेत. उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नातून उपसा सिंचन योजनेच्या एकुण वीजबिलापैकी ८१ टक्के विजेचा भार राज्य शासन भरणार आहे. उरलेले १९ टक्के वीजबिल उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकºयांनी भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पुरंदर उपसा जलसिंचन योजना ही तीन हंगामात चालवली जाते. खरीप हंगामातील पाण्याचा दर एक एमसीएफटी पाण्यासाठी पंच्चावन्न हजार रुपये मोजावे लागत होते. तर रब्बी हंगामासाठी सत्तावन्न हजारांपर्यंत हा दर वाढत जायचा व उन्हाळी हंगामासाठी हाच दर साठ हजारांपर्र्यंत गेला.पुरंदर उपसा जलसिंचन योजना अनेक गावांना वरदान ठरत आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी वाघापूर येथील घाटुळीआई मंदिराजवळ आल्यानंतर ते दिवे, माळशिरस, राजेवाडी पाईपलाईन द्वारे देण्यात येते. यात पाण्याचे विभाजन करुन त्या लाईनवरील शेतकºयांना दिले जाते. पाणी महाग असले तरी पुरंदर तालुक्यातील शेतकरी पैसे जमा करुन पाणी घ्यायचे व विविध पिके करतात.सध्या उन्हाळी हंगामात १९ टक्के दराने पाणी मिळणार असल्याने पुरंदरचा शेतकरी सुखावला आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या आॅफिसमध्ये तसे परिपत्रकही आले आहे. मात्र पाणी आकारणी दर निश्चित करण्यात न आल्याने एक मार्चपासून सुरु होणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना आजही पुरेशी मागणी असूनही बंद आहे. खरे तर एक मार्च अगोदरच दर निश्चित होणे गरजेचे होते. मात्र अद्यापही दर निश्चित करण्यात आले नाही. यामुळे शेतकºयांकडून नक्की किती पैसे घ्यायचे याचा मेळ बसवण्यात आला नाही. यामुळे एक मार्चपासून शेतकºयांनी मागणी करुनही पैसे स्वीकारण्यास कोणीही तयार नाही. यामुळे शेतकरी वर्गामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले.उन्हाळी हंगामाचे फॉर्म भरण्यास सुरुवात...पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे उन्हाळी हंगामातील पाण्याची मागणी नोंदवताना मागणी फॉर्म भरुन देण्यात सुरुवात झाली आहे. या फॉर्मला शेतकºयांचा सातबारा जोडावा लागणार आहे. कालपासून अनेक शेतकरी फॉर्म नेऊन मागणी नोंदवत आहेत. फॉर्म भरुन दिल्यानंतर १९ टक्के दराने पैसे स्वीकारण्यात येणार आहेत.योजनेची चोरी वाढली...पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला पाणी चोरी काही नवीन नाही. गळणाºया एअरवॉलमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. याचा भुर्दंड पाणी घेणारांवर पडतो. पाणी पुरेशा दाबाने मिळू शकत नाही. मागणी केलेल्या शेतकºयांना पाणी देताना पाठीमागे कोणीही या योजनेचे वॉल फिरवून मागणी नसतानाही पाणी घेतात. यामुळे ही योजना अडचणीत येते.दुरुस्ती झालीच नाही...पुरंदर उपसा जलसिंचन योजना पाऊस पडल्यापासून बंद आहे ती आजतागायत. या कालावधीत या योजनेची झालेली दुरवस्था दूर करण्यात यावी अशी मागणी लाभार्थी गावातील शेतकºयांनी केली होती. मात्र योजना बंद असूनदेखील कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही. या योजनेचे अनेक एअरवॉल मोठ्या प्रमाणात गळतात. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. मागणी करूनही ही कामे पूर्ण न केल्यामुळे ज्या वेळी ही योजना सुरु होईल त्या वेळेस गळणाºया एअरवॉलमधून लाखो लिटर पाणी वाया जाणार आहे.कर्मचा-यांची संख्या कमी...पुरंदर उपसा योजनेला सुरुवातीपासूनच कर्मचाºयांची संख्या कमी आहे. यामुळे पाण्याचे पैसे भरताना लगेच पावती दिली जात नाही. योजनेच्या लाईनवर अधिकाºयांना फिरता येत नाही. शेतकºयांची मागणी, पैसे गोळा करणे, पावती देणे, पाण्याचे वाटप करणे, शेतक-यांशी संवाद साधणे, पाणीसंस्था उभ्या करणे इत्यादी कामांसाठी कर्मचाºयांची संख्या कमी आहे. ती वाढविण्याची मागणी लाभार्थी गावातील शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे