शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

दुष्काळ साेसणाऱ्या आजी-आजाेबांना पुणेकर तरुण म्हणतायेत या पुण्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 15:16 IST

पुण्यातील अंघाेळीची गाेळी या संस्थेच्या तरुणांनी दुष्काळ साेसणाऱ्या आजी आजाेबांना एसटी मध्ये बसवून पुण्यात पाठविण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात त्यांची सर्व काळजी घेतली जाणार असून या उपक्रमातून काही काळ या आजी आजाेबांना दुष्काळाचा विसर पडावा अशी आशा या तरुणांना आहे.

पुणे : सध्या मराठवाडा- विदर्भात पाण्याअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 1972 पेक्षा माेठा दुष्काळ असल्याचं बाेललं जात आहे. गुरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहे. गावाकडील वयाेवृद्ध नागरिकांना घाेटभर पाण्यासाठी उन्हात आठ- दहा किलाेमीटर पायपीट करावी लागत आहे. संपूर्ण दिवस हा पाणी भरण्यासाठी जात आहे. अशा दुष्काळ साेसणाऱ्या आजी आजाेबांना पुणेकर तरुण भावनिक साद घालत आहेत. पुण्यातील अंघाेळीची गाेळी या संस्थेच्या तरुणांनी दुष्काळ साेसणाऱ्या आजी आजाेबांना एसटी मध्ये बसवून पुण्यात पाठविण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात त्यांची 2 जूनपर्यंत सर्व काळजी घेतली जाणार असून या उपक्रमातून काही काळ या आजी आजाेबांना दुष्काळाचा विसर पडावा अशी आशा या तरुणांना आहे. 

अंघाेळीची गाेळी ही संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. दुष्काळी भागातील मुलांसाठी दरवर्षी या संस्थेकडून मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबविण्यात येताे. या उपक्रमातून दुष्काळाच्या झळा साेसणाऱ्या लहान मुलांना पुण्यात आणून त्यांना पुण्याची सफर घडविण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. यंदा देखील दुष्काळग्रस्त भागातील मुलांना पुण्याची सफर घडविण्यात आली. याच धर्तीवर आता दुष्काळात हाल साेसणाऱ्या वयाेवृद्ध नागरिकांसाठी पाण्याच्या गावाला जाऊया हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत दुष्काळात हाल हाेणाऱ्या 50 आजी आजाेबांना पुण्यात आळंदी येथे आणण्यात येणार आहे. तेथे त्यांची राहण्याची तसेच जेवणाची साेय करण्यात येणार आहे. त्याचबराेबर त्यांना ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन त्यांच्या सानिध्यात भक्ती करत काही काळ घालवता येणार आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना अंघाेळीची गाेळी या संस्थेचे माधव पाटील म्हणाले, मराठवाडा- विदर्भात यंदा माेठा दुष्काळ पाहायला मिळताेय. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहेत. त्यातच वयाेवृद्ध नागरिकांचे यात हाल हाेत आहे. त्यामुळे त्यांना काहीकाळ दिलासा देण्यासाठी आम्ही पाण्याच्या गावाला जाऊया हा उपक्रम हाती घेत आहाेत. या उपक्रमांतर्गत दुष्काळाच्या झळा साेसणाऱ्या 50 आजी- आजाेबांना आम्ही पुण्यात निवारा आणि अन्नछत्राची व्यवस्था करणार आहाेत. या आजी आजाेबांचे आम्ही काही काळासाठी मुलं हाेणार आहाेत. आजी- आजाेबांना पुण्याच्या एसटीत बसवावे पुढची जबाबदारी आम्ही घेऊ असे आवाहन आम्ही करत आहाेत. आळंदीमधील धर्मशाळेमध्ये आम्ही आजी- आजाेबांची साेय करणार आहाेत.  

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणेWaterपाणीFarmerशेतकरी