शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुण्याला १० टक्के पाणी कपात; पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव पुणे महापालिकेने फेटाळला, आयुक्तांनी नाकारली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 10:49 IST

धरणातून २५ टीएमसी पाणी नदीत सोडले असताना पाटबंधारे विभागाचा पाणी कपातीचा घाट कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे

पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पुणे महापालिका पाण्याचा जादा वापर करत आहे. त्यामुळे जल संपत्ती नियामक आयोगाच्या आदेशानुसार पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खडकवासला येथील पालिकेचे पाणी उपशाचे पंप हाऊस (जॅकवेल) पाटबंधारे विभागाच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत आहे. शहराचे पाणी कमी करून १० टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने ठेवला होता. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे अभियंता पालिकेत आले होते. पण या मागणीवरून पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी भेट नाकारून पाणी कपातीचा प्रस्तावही फेटाळला आहे.

पुणे महापालिका हद्दीसाठी खडकवासला प्रकल्पातून ११.६ टीएमसी, पवना नदीपात्रातून ०.३४ टीएमसी, भामा आसखेड प्रकल्पातून २.६७ टीएमसी आणि समाविष्ट गावासाठी १.७५ टीएमसी, अशाप्रकारे १६.३६ टीएमसी पाणी मंजूर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण हे भविष्यकालीन लोकसंख्येसाठी मंजूर केले आहे. शहरातील लोकसंख्या वाढीची माहिती लक्षात घेऊन महापालिकेस ७६ लाख १६ हजार लोकसंख्येसाठी २०३१ पर्यंत १४.६१ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पालिकेचा पाणी वापर त्यापेक्षा अधिक आहे. पालिकेने शहरासाठी २०२१ मध्ये २२.१९ टीएमसी, २०२२ मध्ये २२.७१ टीएमसी, २०२३ मध्ये २२.७७ टीएमसी, २०२४ मध्ये २०.९९ टीएमसी, तर २०२४-२५ मध्ये २२.१ टीएमसी पाणी वापरले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य जल संपत्ती नियामक आयोगाकडे झालेल्या सुनावणीत महापालिका पाणी वापर नियंत्रित करणार नसेल तर खडकवासला येथील जॅकवेलचे नियंत्रण पाटबंधारे विभागाकडे देण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. मात्र, पालिकेने अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. याबाबत पाटबंधारे विभाग सातत्याने पालिकेस पत्रही पाठवत आहे. त्यानुसार पाटबंधारे विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक होणार होती. पण पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याला भेट नाकारली आहे.

पाणी कपातीचा घाट

शहरात जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला प्रकल्पातून आतापर्यंत मुठा नदीत २५ टीएमसी पाणी सोडले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असताना पाटबंधारे विभागाने १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. धरणातून २५ टीएमसी पाणी नदीत सोडले असताना पाटबंधारे विभागाचा पाणी कपातीचा घाट कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुरवठ्यात कपात नको

पुणे शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्याचा घाट घालण्यात येत आहे. परंतु सध्या शहराला होत असलेला पाणीपुरवठा हाच अपुरा आहे. त्यामुळे पाणी कपात नको, अशी मागणी प्रणव रवींद्र धंगेकर यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीDamधरणRainपाऊसriverनदीcommissionerआयुक्त