शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पुण्याला १० टक्के पाणी कपात; पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव पुणे महापालिकेने फेटाळला, आयुक्तांनी नाकारली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 10:49 IST

धरणातून २५ टीएमसी पाणी नदीत सोडले असताना पाटबंधारे विभागाचा पाणी कपातीचा घाट कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे

पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पुणे महापालिका पाण्याचा जादा वापर करत आहे. त्यामुळे जल संपत्ती नियामक आयोगाच्या आदेशानुसार पाणी वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खडकवासला येथील पालिकेचे पाणी उपशाचे पंप हाऊस (जॅकवेल) पाटबंधारे विभागाच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत आहे. शहराचे पाणी कमी करून १० टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने ठेवला होता. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे अभियंता पालिकेत आले होते. पण या मागणीवरून पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी भेट नाकारून पाणी कपातीचा प्रस्तावही फेटाळला आहे.

पुणे महापालिका हद्दीसाठी खडकवासला प्रकल्पातून ११.६ टीएमसी, पवना नदीपात्रातून ०.३४ टीएमसी, भामा आसखेड प्रकल्पातून २.६७ टीएमसी आणि समाविष्ट गावासाठी १.७५ टीएमसी, अशाप्रकारे १६.३६ टीएमसी पाणी मंजूर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण हे भविष्यकालीन लोकसंख्येसाठी मंजूर केले आहे. शहरातील लोकसंख्या वाढीची माहिती लक्षात घेऊन महापालिकेस ७६ लाख १६ हजार लोकसंख्येसाठी २०३१ पर्यंत १४.६१ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पालिकेचा पाणी वापर त्यापेक्षा अधिक आहे. पालिकेने शहरासाठी २०२१ मध्ये २२.१९ टीएमसी, २०२२ मध्ये २२.७१ टीएमसी, २०२३ मध्ये २२.७७ टीएमसी, २०२४ मध्ये २०.९९ टीएमसी, तर २०२४-२५ मध्ये २२.१ टीएमसी पाणी वापरले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य जल संपत्ती नियामक आयोगाकडे झालेल्या सुनावणीत महापालिका पाणी वापर नियंत्रित करणार नसेल तर खडकवासला येथील जॅकवेलचे नियंत्रण पाटबंधारे विभागाकडे देण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. मात्र, पालिकेने अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. याबाबत पाटबंधारे विभाग सातत्याने पालिकेस पत्रही पाठवत आहे. त्यानुसार पाटबंधारे विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक होणार होती. पण पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याला भेट नाकारली आहे.

पाणी कपातीचा घाट

शहरात जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला प्रकल्पातून आतापर्यंत मुठा नदीत २५ टीएमसी पाणी सोडले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असताना पाटबंधारे विभागाने १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. धरणातून २५ टीएमसी पाणी नदीत सोडले असताना पाटबंधारे विभागाचा पाणी कपातीचा घाट कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुरवठ्यात कपात नको

पुणे शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्याचा घाट घालण्यात येत आहे. परंतु सध्या शहराला होत असलेला पाणीपुरवठा हाच अपुरा आहे. त्यामुळे पाणी कपात नको, अशी मागणी प्रणव रवींद्र धंगेकर यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीDamधरणRainपाऊसriverनदीcommissionerआयुक्त