शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

उद्योगांना त्रास देणारी गुन्हेगारी मोडून काढू- अंकित गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 15:01 IST

तंत्रज्ञानाचा वापर करून खंडणी उकळण्यासारखे प्रकारही उघड...

पुणे : उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार असतानाच पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीत गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. हाच चिंतेचा विषय ठरत आहे. उद्योजकांना स्थानिक गुन्हेगारांकडून तसेच गुंडांकडून वारंवार त्रास दिला जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून खंडणी उकळण्यासारखे प्रकारही घडत आहेत.

या पार्श्वभूमीवर एमआयडीसी भागातील गुन्हेगारांवर मोक्का आणि एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले. उद्योजक आणि नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. याबद्दल 'लोकमत'शी बोलताना गोयल यांनी कठोर उपाययाेजना करणार असल्याचे स्पष्ट केले. याच विषयावर गोयल यांच्याशी बातचीत केली.

ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना कोणती आव्हाने आहेत?- शहरांबरोबर आता ग्रामीण भागातही सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी ‘सायबर सुरक्षा दिंडी' सुरू केली. या दिंडीत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येेते. नागरिकांनीही त्यांचे बँकेचे डिटेल्स, मोबाईलवर येणारे ओटीपी किंवा इतर पासवर्ड कुणालाही शेअर करू नये. सायबर गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे तरुण वर्गात (वय १५ ते १७) गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. सोशल मीडियावर इतर मोठ्या गुन्हेगाराला फॉलो करणे तसेच हिंसा दाखवणारी स्टेटस ठेवणे, स्थानिक भागात स्वतःला डॉन म्हणवून घेऊन गुन्हे करणे याचे प्रमाण वाढले आहे. यातील बरीच मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. ट्रॅफिक जॅम, वाढत्या चोरींचे प्रमाण हे देखील आव्हान आहे.

एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी कशी रोखणार?

- जिल्ह्यातील महत्त्वाच्या एमआयडीसीत बाहेरचे किंवा स्थानिक उद्योजकांना 'फ्री अँड फेअर' बिजनेस करता यावा, ज्याच्यासोबत व्यवहार करायचा आहे त्याच्याशीच करता यावा, यासाठी सगळ्या एमआयडीसीमध्ये बैठका घेणार आहोत. नियमितपणे बैठका घेऊन तिथल्या अडचणी जाणून घेतल्या जातील. एमआयडीसीतील सर्व गुन्हेगारांचे जुने रेकॉर्ड काढण्यात आले आहेत. या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त मोक्का आणि एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहोत. यापुढे कोणत्याही उद्योजकाला विनाकारण त्रास दिला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

नवीन वर्षात प्राधान्याने कोणत्या गोष्टींवर लक्ष असणार?

नागरिकांमध्ये भीती पसरवणारे गुन्हे कमी करण्याला पहिले प्राधान्य असेल. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार उपलब्ध मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त गुन्ह्यांची उकल करणार आहोत. कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यावेळी नवीन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला. ड्रोनला स्पीकर लाऊन नागरिकांना सूचना देण्याचा प्रयोग यंदा प्रथमत:च केला होता. पोलिस यंत्रणेत तंत्रज्ञानाचा वापर करणे हे एक प्राधान्य असेल.

ग्रामीण नागरिकांकडून आपल्या अपेक्षा काय?पोलिसांच्या सूचना सर्वांनी पाळल्या पाहिजेत. पोलिस हे तुमचे मित्र आहेत, या भावनेने त्यांनी आमच्याकडे आले पाहिजे. नागरिकांनी न घाबरता पोलिस स्टेशनमध्ये यावे. त्यांच्या अडचणी पोलिसांना सांगाव्यात. पोलिस ठाण्यात कोणी तुमच्या तक्रारीला दाद दिली नाही तर त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क करावा. तसेच ११२ या नंबरवर अडचणी सांगाव्यात.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र