शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कामांमुळे पालखी महामार्गाची वाटचाल खडतर; वारकऱ्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:02 IST

- इंदापूर बायपास येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या पुलाखाली पालखी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे.

बावडा : श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे इंदापूर बायपास ते सराटी दरम्यानचे काम अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने लगतच्या गावांतील ग्रामस्थांसह वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही पालखी सोहळ्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा पूर्ण न झाल्याने यंदाच्या आषाढी वारीतही वारकऱ्यांना खडतर प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

यंदा जुलै महिन्यात श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार असताना महामार्गावरील अपूर्ण कामे आणि विस्कळीत व्यवस्था चिंतेचा विषय ठरत आहेत. गेल्यावर्षीही पालखी सोहळा प्रमुखांनी या महामार्गाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पालखी मुक्कामाच्या गावांमधील सर्व्हिस रोड, गटर लाईन आणि इतर सुविधांची अवस्था पाहता ‘हा मार्ग खरोखर पालखी सोहळ्यासाठीच तयार करण्यात आला आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

इंदापूर बायपास येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या पुलाखाली पालखी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. वडापुरी (ता. इंदापूर) येथील उड्डाणपुलाचे कामही संथ गतीने सुरू असून, त्या परिसरातील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याची तक्रार आहे. सर्व्हिस रोडच्या दुतर्फा गटर लाईनचे काम रखडलेले असल्याने पावसाळ्यात वारकरी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वकीलवस्ती येथील रस्त्याचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. बावडा येथील पालखी महामार्ग बायपासचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच बावडा जीवननगर परिसरातील क्रॉस रोडवर पथदिवे आणि दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे महामार्गाचे काम पूर्ण नसतानाही टोल वसुली सुरू असल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टोल नाक्याजवळ सराटीच्या बाजूने महामार्गाचे कामही अद्याप अपूर्ण असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कामे पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Incomplete Work on Palkhi Highway Frustrates Warkaris, Hinders Progress

Web Summary : Incomplete work on the Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Highway is causing frustration among villagers and Warkaris. Key areas like the Indapur bypass and Vadapuri flyover remain unfinished, lacking essential facilities. This forces devotees to face a difficult pilgrimage and raises safety concerns due to missing lights and signage.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र