शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६ लाख; ॲग्रिस्टॅक योजनेतून आकडेवारी स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:24 IST

- एकूण नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या दहा लाख

पुणे : जिल्ह्यात एकूण दहा लाख शेतकरी कागदोपत्री असले तरी केवळ सहा लाख शेतकरीच खरे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान खरीप पीकविमा, पीएम किसान यासह कृषी विभागाच्या सर्वच योजनांना योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेत नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आली असले तरी जिल्ह्यातील केवळ सहा लाख शेतकऱ्यांनीच हा ओळख क्रमांक घेतला आहे. त्यामुळे अन्य ४० टक्के नागरिकांच्या नावावर शेती असली तरी ते शेतीच करत नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जमाबंदी आयुक्तांना कळविले आहे.

राज्यात शेतकरी, त्यांच्या नावावरील शेती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडून अधिकार अभिलेखात नावनोंदणी करण्यात येत आहे. यातून ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष शेती नावावर असलेल्यांची संख्या जास्त असून, ओळख क्रमांक घेतलेल्यांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी अशा शेतकऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातही अशी पडताळणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्व १३ तालुक्यांत १० लाख ३९ हजार १०१ नागरिकांच्या नावावर सातबारा उतारा अर्थात शेती आहे. त्यात सर्वाधिक १ लाख २६ हजार ८९ शेतकरी बारामती तालुक्यात आहेत, तर हवेली तालुक्यात ही संख्या ५९ हजार ४१६ शेतकरी आहेत. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान आणि पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.आतापर्यंत ५ लाख ४२ हजार ५५६ शेतकऱ्यांनाच ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक देण्यात आला असून, अजून ८४ हजार १३० शेतकऱ्यांना तो देता येईल असा अहवाल जमाबंदी आयुक्तांना पाठविला आहे. तर, ४ लाख ९६ हजार ५४५ शेतकऱ्यांना अजून ओळख क्रमांक देण्यात आलेला नाही. त्यातील अजून ८४ हजार १३० शेतकऱ्यांना हा ओळख क्रमांक देण्यात येणार असून, ४ लाख १२ हजार ४१५ शेतकऱ्यांना हा क्रमांक देता येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जमाबंदी आयुक्तांना दिलेल्या अहवालात पाच गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेले, परगावी राहणारे, नव्याने वारस नोंद झालेले, सरकारी कंपनी- संंस्था असलेले खातेदार यांची पडताळणी करून ग्राम महसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार सुमारे चार लाख २१ हजार ४१५ अर्थात ४० टक्के जणांनी यात नोंदणी केलेली नाही किंवा करणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६ लाखच असणार आहे.

आतापर्यंत ५ लाख ४२ हजार ५५६ शेतकऱ्यांनाच ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक देण्यात आला असून, अजून ८४ हजार १३० शेतकऱ्यांना तो देता येईल, असा अहवाल जमाबंदी आयुक्तांना पाठविला आहे.  - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, कुळकायदा 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र