शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६ लाख; ॲग्रिस्टॅक योजनेतून आकडेवारी स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:24 IST

- एकूण नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या दहा लाख

पुणे : जिल्ह्यात एकूण दहा लाख शेतकरी कागदोपत्री असले तरी केवळ सहा लाख शेतकरीच खरे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान खरीप पीकविमा, पीएम किसान यासह कृषी विभागाच्या सर्वच योजनांना योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेत नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आली असले तरी जिल्ह्यातील केवळ सहा लाख शेतकऱ्यांनीच हा ओळख क्रमांक घेतला आहे. त्यामुळे अन्य ४० टक्के नागरिकांच्या नावावर शेती असली तरी ते शेतीच करत नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जमाबंदी आयुक्तांना कळविले आहे.

राज्यात शेतकरी, त्यांच्या नावावरील शेती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडून अधिकार अभिलेखात नावनोंदणी करण्यात येत आहे. यातून ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष शेती नावावर असलेल्यांची संख्या जास्त असून, ओळख क्रमांक घेतलेल्यांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी अशा शेतकऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातही अशी पडताळणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्व १३ तालुक्यांत १० लाख ३९ हजार १०१ नागरिकांच्या नावावर सातबारा उतारा अर्थात शेती आहे. त्यात सर्वाधिक १ लाख २६ हजार ८९ शेतकरी बारामती तालुक्यात आहेत, तर हवेली तालुक्यात ही संख्या ५९ हजार ४१६ शेतकरी आहेत. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान आणि पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.आतापर्यंत ५ लाख ४२ हजार ५५६ शेतकऱ्यांनाच ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक देण्यात आला असून, अजून ८४ हजार १३० शेतकऱ्यांना तो देता येईल असा अहवाल जमाबंदी आयुक्तांना पाठविला आहे. तर, ४ लाख ९६ हजार ५४५ शेतकऱ्यांना अजून ओळख क्रमांक देण्यात आलेला नाही. त्यातील अजून ८४ हजार १३० शेतकऱ्यांना हा ओळख क्रमांक देण्यात येणार असून, ४ लाख १२ हजार ४१५ शेतकऱ्यांना हा क्रमांक देता येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जमाबंदी आयुक्तांना दिलेल्या अहवालात पाच गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेले, परगावी राहणारे, नव्याने वारस नोंद झालेले, सरकारी कंपनी- संंस्था असलेले खातेदार यांची पडताळणी करून ग्राम महसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार सुमारे चार लाख २१ हजार ४१५ अर्थात ४० टक्के जणांनी यात नोंदणी केलेली नाही किंवा करणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६ लाखच असणार आहे.

आतापर्यंत ५ लाख ४२ हजार ५५६ शेतकऱ्यांनाच ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक देण्यात आला असून, अजून ८४ हजार १३० शेतकऱ्यांना तो देता येईल, असा अहवाल जमाबंदी आयुक्तांना पाठविला आहे.  - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, कुळकायदा 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र