शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; मध्यरात्री अनेकांना अटक; गावात जमावबंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 09:34 IST

- एका वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि संतप्त जमावाने दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

यवत: येथे शुक्रवारी समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे उसळलेल्या दंगलीनंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत मध्यरात्री अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून, गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी एका वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि संतप्त जमावाने दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या दंगलीत अनेक वाहने जाळण्यात आली, तसेच काही दुकानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

प्रशासनाची तातडीची कारवाई

घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाने तात्काळ जमावबंदी आदेश लागू केला. पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी यवत पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि आवश्यक मदत तसेच संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कूल यांनीही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

पोलिसांची रात्रभर कारवाई

मध्यरात्रीपासून पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला. काही आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर फरार संशयितांचा शोध सुरू आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रशासनाचे आवाहन

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पोलिस आणि प्रशासन सतर्क आहे. गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी