शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

Indapur Rains: इंदापुरात पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले; दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:18 IST

Indapur Rains: महसूल विभागाला दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे.

इंदापूर : यंदाच्या पावसाळ्याने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोनवेळा अश्रू ढाळण्याची वेळ आणली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आणि आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पिकांची नासाडी केली आहे. या दोन्ही घटनांमुळे महसूल विभागाला दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने ८,५९९ शेतकऱ्यांच्या २४,७७१.६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये १,८००.१९ हेक्टर बागायती क्षेत्र, १५५.५६ हेक्टर फळपिके, १,८१०.२९ हेक्टर इतर पिके आणि ५०५ हेक्टर क्षेत्रावरील जमीन खरडून जाण्याच्या घटना समाविष्ट होत्या. या नुकसानीसाठी ५ कोटी ५७ लाख ५८ हजार ६१० रुपयांची भरपाई मंजूर झाली. बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १७,००० रुपये, फळबागांसाठी २३,००० रुपये आणि जमीन खरडून जाण्यासाठी ४७,००० रुपये याप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

परतीच्या पावसाने झोडपले

मागील आठवड्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पिकांचे नुकसान केले. आतापर्यंत ८२५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून, जून-जुलैमध्ये नदीकाठच्या आणि लवणात पेरलेल्या पिकांचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगामात मक्याची २८३.३ टक्के (१८,४१६ हेक्टर), उडदाची ११३.२ टक्के (२१९.५ हेक्टर), सोयाबीनची ११९.३ टक्के (२६०.५ हेक्टर), कांद्याची १६८.५ टक्के (५२९ हेक्टर) आणि टोमॅटोची २११.४ टक्के (३०४.४ हेक्टर) पेरणी झाली होती. याशिवाय, चाऱ्याच्या पिकांमध्ये मक्याच्या चाऱ्याची २१९.१ टक्के (४,४१०.१० हेक्टर) आणि कडवळाची १६३.५ टक्के (१,९२७.८ हेक्टर) पेरणी झाली होती. या पिकांचे बहुतांश ठिकाणी नुकसान झाल्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांपुढील संकट

एका वर्षात एकाच पिकासाठी दोनवेळा नुकसानभरपाई देण्याची तरतूद नसल्याने, दोनदा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून, वरकुटे बुद्रुक येथील शेतातील दृश्य या संकटाचे मूक साक्षीदार आहे.

शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा आहे. मात्र, एकाच हंगामात दोनदा झालेल्या नुकसानीमुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. महसूल विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असली, तरी शेतकऱ्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाRainपाऊसweatherहवामान अंदाज