शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

Indapur Rains: इंदापुरात पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले; दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:18 IST

Indapur Rains: महसूल विभागाला दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे.

इंदापूर : यंदाच्या पावसाळ्याने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोनवेळा अश्रू ढाळण्याची वेळ आणली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आणि आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पिकांची नासाडी केली आहे. या दोन्ही घटनांमुळे महसूल विभागाला दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने ८,५९९ शेतकऱ्यांच्या २४,७७१.६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये १,८००.१९ हेक्टर बागायती क्षेत्र, १५५.५६ हेक्टर फळपिके, १,८१०.२९ हेक्टर इतर पिके आणि ५०५ हेक्टर क्षेत्रावरील जमीन खरडून जाण्याच्या घटना समाविष्ट होत्या. या नुकसानीसाठी ५ कोटी ५७ लाख ५८ हजार ६१० रुपयांची भरपाई मंजूर झाली. बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १७,००० रुपये, फळबागांसाठी २३,००० रुपये आणि जमीन खरडून जाण्यासाठी ४७,००० रुपये याप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

परतीच्या पावसाने झोडपले

मागील आठवड्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पिकांचे नुकसान केले. आतापर्यंत ८२५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून, जून-जुलैमध्ये नदीकाठच्या आणि लवणात पेरलेल्या पिकांचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगामात मक्याची २८३.३ टक्के (१८,४१६ हेक्टर), उडदाची ११३.२ टक्के (२१९.५ हेक्टर), सोयाबीनची ११९.३ टक्के (२६०.५ हेक्टर), कांद्याची १६८.५ टक्के (५२९ हेक्टर) आणि टोमॅटोची २११.४ टक्के (३०४.४ हेक्टर) पेरणी झाली होती. याशिवाय, चाऱ्याच्या पिकांमध्ये मक्याच्या चाऱ्याची २१९.१ टक्के (४,४१०.१० हेक्टर) आणि कडवळाची १६३.५ टक्के (१,९२७.८ हेक्टर) पेरणी झाली होती. या पिकांचे बहुतांश ठिकाणी नुकसान झाल्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांपुढील संकट

एका वर्षात एकाच पिकासाठी दोनवेळा नुकसानभरपाई देण्याची तरतूद नसल्याने, दोनदा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून, वरकुटे बुद्रुक येथील शेतातील दृश्य या संकटाचे मूक साक्षीदार आहे.

शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा आहे. मात्र, एकाच हंगामात दोनदा झालेल्या नुकसानीमुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. महसूल विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असली, तरी शेतकऱ्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाRainपाऊसweatherहवामान अंदाज