शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

Indapur Rains: इंदापुरात पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले; दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:18 IST

Indapur Rains: महसूल विभागाला दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे.

इंदापूर : यंदाच्या पावसाळ्याने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोनवेळा अश्रू ढाळण्याची वेळ आणली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आणि आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पिकांची नासाडी केली आहे. या दोन्ही घटनांमुळे महसूल विभागाला दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने ८,५९९ शेतकऱ्यांच्या २४,७७१.६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये १,८००.१९ हेक्टर बागायती क्षेत्र, १५५.५६ हेक्टर फळपिके, १,८१०.२९ हेक्टर इतर पिके आणि ५०५ हेक्टर क्षेत्रावरील जमीन खरडून जाण्याच्या घटना समाविष्ट होत्या. या नुकसानीसाठी ५ कोटी ५७ लाख ५८ हजार ६१० रुपयांची भरपाई मंजूर झाली. बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १७,००० रुपये, फळबागांसाठी २३,००० रुपये आणि जमीन खरडून जाण्यासाठी ४७,००० रुपये याप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

परतीच्या पावसाने झोडपले

मागील आठवड्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पिकांचे नुकसान केले. आतापर्यंत ८२५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून, जून-जुलैमध्ये नदीकाठच्या आणि लवणात पेरलेल्या पिकांचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगामात मक्याची २८३.३ टक्के (१८,४१६ हेक्टर), उडदाची ११३.२ टक्के (२१९.५ हेक्टर), सोयाबीनची ११९.३ टक्के (२६०.५ हेक्टर), कांद्याची १६८.५ टक्के (५२९ हेक्टर) आणि टोमॅटोची २११.४ टक्के (३०४.४ हेक्टर) पेरणी झाली होती. याशिवाय, चाऱ्याच्या पिकांमध्ये मक्याच्या चाऱ्याची २१९.१ टक्के (४,४१०.१० हेक्टर) आणि कडवळाची १६३.५ टक्के (१,९२७.८ हेक्टर) पेरणी झाली होती. या पिकांचे बहुतांश ठिकाणी नुकसान झाल्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांपुढील संकट

एका वर्षात एकाच पिकासाठी दोनवेळा नुकसानभरपाई देण्याची तरतूद नसल्याने, दोनदा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून, वरकुटे बुद्रुक येथील शेतातील दृश्य या संकटाचे मूक साक्षीदार आहे.

शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा आहे. मात्र, एकाच हंगामात दोनदा झालेल्या नुकसानीमुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. महसूल विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असली, तरी शेतकऱ्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाRainपाऊसweatherहवामान अंदाज