शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
3
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
4
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
5
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
6
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
7
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
8
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
9
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
10
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
11
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
12
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
13
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
14
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
15
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
16
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
17
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
18
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
19
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
20
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या दरात वर्षभर वाढ न झाल्याने बळीराजा चिंतेत..! कांदा चाळीत सडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घुसमट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:53 IST

- सध्या कांद्याला १० ते १७ रुपये प्रतिकिलो एवढाच दर मिळतोय : उत्तम प्रतीच्या मालाला कमी दर मिळणे शेतकऱ्यांसाठी निराशाजनक

ओतूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी, गेल्या वर्षभरात भाव स्थिर राहिल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या कांद्याला केवळ १० ते १७ रुपये प्रति किलो एवढाच दर मिळत आहे. उत्तम प्रतीचा माल असूनही एवढा कमी दर मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत निराशाजनक आहे. खत, मजुरी, पाणी, वाहतूक, प्रक्रिया व साठवणूक यांसारख्या सर्व बाबतींत वाढलेला खर्च पाहता, सध्या मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

गेल्या वर्षी दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, दीर्घकाळ साठवणुकीमुळे अर्ध्याहून अधिक कांदा गुदमरून सडला. त्यामुळे आता नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकावे लागत आहे. वर्षभराच्या कष्टाचे चीज होईल, अशी अपेक्षा मोडल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांची नाराजी फक्त कांदापुरती मर्यादित नाही, तर सोयाबीनसारख्या इतर पिकांनाही योग्य दर मिळत नाहीत.

कांद्याचे दरही वर्षभर २० रुपयांच्या पुढे गेलेले नाहीत. या दरांत उतार होऊन ५ रुपयांपासून १४ रुपयांपर्यंत सरासरी होत आहे. काही शेतकऱ्यांनी माल चाळीत साठवून ठेवला, तर अनेकांनी दर वाढतील या आशेवर विक्री टाळली. मात्र, या प्रतीक्षेचा काही फायदा झाला नसल्याने आता मिळेल त्या दरात उरलेला व सुरलेला माल विकण्याशिवाय पर्याय नाही.

काही शेतकरी सडलेल्या किंवा विकल्या न गेलेल्या कांद्याचा बियाण्यासाठी वापर करण्याचा विचार करत आहेत, पण संपूर्ण माल बियाणे म्हणून विकता येत नाही. त्यामुळे उपलब्ध माल कमी भावात विकण्यास शेतकरी बाध्य झाले आहेत. सद्यस्थितीत नवीन कांद्याचा हंगाम सुरू असल्यामुळे कांदा रोप, खते, औषधे, मजुरी आणि सिंचनासाठी लागणारी आर्थिक तरतूद करणे शेतकऱ्यांसाठी अधिकच कठीण झाली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, आम्हाला कर्ज उपलब्ध होते म्हणून आम्ही नफा कमावतो, हे शासनाचे गणित चुकीचे आहे. प्रत्यक्ष शेती करताना येणाऱ्या अडचणी, खर्च, बाजारभाव आणि हवामानातील अस्थिरता याकडे कुणाचेच लक्ष नाही. कांदा आणि सोयाबीन या दोन महत्त्वाच्या पिकांच्या दरात योग्य वाढ न झाल्यास शेतकरी कसा तग धरेल, असा सवाल शेतकरीवर्गातून उपस्थित होत आहे.

दरवाढीची न्याय मागणी शासनाने तातडीने लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहे. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव स्थिर राहणे हे बळीराजासाठी सर्वात मोठी चिंता ठरले आहे. योग्य दर मिळाल्यासच शेतकरी सावरू शकतो, अन्यथा परिस्थिती अधिकच गंभीर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आधुनिक जगात कांदा–सोयाबीनसारखी कोणतीही पिके घेतली, तरी शेतकरी वेड्यात निघतोय, नव्हे तर त्याला वेड्यात काढले जातेय, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण, शेतकऱ्याकडे असलेल्या मालाला बाजारभाव नाही आणि जे माल त्याच्याकडे नाही त्याला सोन्याचा भाव आहे. सरकार आणि व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्याचे चित्र हे सर्वत्र दिसून येते. - शिवशंकर घोलप, कांदा उत्पादक शेतकरी

English
हिंदी सारांश
Web Title : Onion price stagnation worries farmers; rotting crop adds to woes.

Web Summary : Onion farmers face crisis as prices remain low despite high yields. Storage losses worsen the situation. Farmers struggle with rising costs and seek government intervention for fair pricing of onions and soybeans.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेonionकांदाAgriculture Schemeकृषी योजना