Pune MIDC fire :नेमकी कशी लागली आग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:17 IST2021-06-07T22:13:39+5:302021-06-07T22:17:03+5:30
श्वास घ्यायला त्रास झाल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही

Pune MIDC fire :नेमकी कशी लागली आग?
पुण्यातल्या उरवडेमध्ये लागलेली आग विझवणयासाठी फायर ब्रिगेड चे कर्मचारी गेले अनेक तास झुंजत आहेत. पुण्यातील पुणे महानगर प्राधिकरणाच्या फायर ब्रिगेडचे जवळपास ७० कर्मचारी घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोचले होते. गेले अनेक तास शर्थीचे प्रयत्न करत आग विझवून त्यांनी १८ मृतदेह बाहेर काढले आहेत. आता पुन्हा भडका उडू नये म्हणून कुलिंग चं काम सुरू झालं आहे.
पण ही आग नेमकी लागली कशी याविषयी लोकमतशी बोलताना पीएमआरडीए चे अग्निशमन अधिकारी देवंद्र पोटफोडे म्हणाले ,"साधारण चार वाजता आग लागली असल्याचा कॉल आला.इथे आलो तेव्हा सुरुवातीला काही दिसत नव्हतं. त्यामुळे अंदाज घेणं अवघड झालं होतं. धुरामुळे दार पण दिसत नव्हतं त्यामुळे आल्या आल्या आम्ही जेसीबी नी भिंती पडल्या."
कंपनी कडून ३७ लोकांची यादी दिली आणि १७ जण सापडत नसल्याचं फायर ब्रिगेड चा अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांना सापडले ते मात्र या १७ जणांचे मृतदेहच. पोटफोडे यांच्या मते मृतदेहांची अवस्था अशी होती की त्यांचा शरीराचा अक्षरश: कोळसा झाला होता.
आगीचे कारण स्पष्ट करताना पोटफोडे म्हणाले ,"हे केमिकल आग लागणारे नाहीत.पण ते केमिकल प्लॅस्टिक मध्ये पॅक करत असताना स्पार्क उडून आग लागली. महिला खाली बसून काम करत होत्या.त्यांना कळलंच नाही. आणि पळून जाण्याची संधी मिळाली नाही.श्वास घ्यायला त्रास झाल्याने लोकांना बाहेर पडता आलं नाही."