शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

वाढीव गावांचा समावेश होण्यासाठी कळमोडी योजनेला विलंब; विधानपरिषदेतील लक्षवेधीला जलसंपदामंत्र्यांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 09:24 IST

खेडच्या पश्चिम व पूर्व भागातील १५५७ हेक्टर वाढीव क्षेत्र समाविष्ट करण्याचे जलसंपदा विभागाने प्रस्तावित केले आहे.

पुणे : सन १९९७ साली घोषित झालेल्या कळमोडी मध्यम प्रकल्पातील उपसा योजना अद्याप कागदावर असल्याने आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडली. खेड तालुक्याच्या पश्चिम व आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील ५०६५ हेक्टर क्षेत्र मूळ उपसा योजनेत समाविष्ट होते. त्याचा सुप्रमा अद्याप प्रलंबित आहे. खेडच्या पश्चिम व पूर्व भागातील १५५७ हेक्टर वाढीव क्षेत्र समाविष्ट करण्याचे जलसंपदा विभागाने प्रस्तावित केले आहे.

औद्योगिकीकरण व नागरिकीकरणामुळे चास कमान कालव्यावर अवलंबून असलेले सिंचन क्षेत्र कमी झाल्याने कळमोडी धरणाचे चासकमान धरणासाठी राखीव असलेले १.०७ टीएमसी पाणी उपसा योजनेला देऊन खेड, आंबेगाव शिरूर तालुक्यांतील १० ते १२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. त्यामुळे याबाबत वंचित भागासाठी शासन तातडीने काय कार्यवाही करू शकते, अशी मागणी लक्षवेधीद्वारे करण्यात आली. त्यावर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाढीव गावांचा समावेश होण्यासाठी योजनेला विलंब होत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होल्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक टाव्हरे गेली अनेक वर्षे कळमोडी योजनेसाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या व भाजप विधानमंडळ सचिव राजू खंडीझोड पाठपुराव्यानुसार आमदार उमा खापरे तसेच आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार परिणय फुके यांनी लक्षवेधी सूचना दिली होती. विधानपरिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाढीव गावे समाविष्ट होत असल्याने सुप्रमास विलंब होत आहे. तसेच बंद पाइपलाइनद्वारे पाणी उपसा योजनेला देऊन अतिरिक्त वाढीव क्षेत्र सामावून घेतले जाणार आहे. तसेच औद्योगिकीकरण व नागरिकीकरणामुळे चास कमान धरणाचे लाभक्षेत्र कमी झाल्याचे मान्य केले. वाढीव गावांचा समावेश होण्यासाठी योजनेला विलंब होत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलwater shortageपाणीकपात