जिवे मारण्याची धमकी देऊन १५ लाखांच्या खंडणीची मागणी;चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:21 IST2025-06-17T18:20:57+5:302025-06-17T18:21:18+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये नेऊन एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन १५ लाखांच्या खंडणी मागितली.

जिवे मारण्याची धमकी देऊन १५ लाखांच्या खंडणीची मागणी;चौघांना अटक
पुणे : तरुणाला त्याच्याच घरात डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी देऊन बेदम मारहाण करीत १५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना वाघोली येथे घडली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्या दोन फरार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
गौरव कांबळे (वय २९, रा. चिचंवड, रेल्वे स्टेशनजवळ) ऋषिकेश किशोर शिंदे (वय २४, रा. निगडी) मोहम्मद इरफान खान (वय ३३, रा. नवी मुंबई) मोहम्मद अतहर सोहेल मोहम्मद अनवर (वय २८, रा. मुंबई) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांचे दोन साथीदार पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. याबाबत जवनताराम तीलोकरामजी चौधरी (सारंग) (वय ३७, रा. उबाळेनगर, वाघोली ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चौधरी (सारंग) हे कुटुंबीयासह वाघोलीतील उबाळेनगरात राहायला आहेत. दि. १४ जूनला आरोपी गौरव कांबळे याने साथीदारांना बोलावून तक्रारदाराला त्यांच्या घरी गाठले. तू अक्षय आणि आर्यनला सोडून का दिले आहे, अशी विचारणा केली. अक्षयने घेतलेल्या २५ लाखांपैकी १५ लाख रुपये मला दे, अशी मागणी करीत आरोपी कांबळे साथीदारांच्या मदतीने चौधरी यांना जबरदस्तीने गाडीत बसविले. त्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये नेऊन एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन १५ लाखांच्या खंडणी मागितली. त्यानंतर चौधरी यांचा चुलतभाऊ जेठाराम सारंग यांच्याकडून दहा लाख रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.