शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पुणेकर म्हणतात, "पावती नको; पण वाहतूक पोलिसांचा धाक हवा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 15:06 IST

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई हाेणे आवश्यक : नागरिकांचे मत

पुणे : वाहतूक पाेलिसांकडून दंडात्मक कारवाई थांबल्याने बेशिस्त वाहनचालक सुसाट सुटले आहेत. वाहतूक पोलिसांसमोरूनच नियम मोडून जाणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढू लागली आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई व्हावी. पावती नको; पण वाहतूक पोलिसांचा धाक हवा, अशी प्रतिक्रिया पुणेकर नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी केवळ वाहतुकीचे नियमन करावे, रस्त्यावर उभे राहून पावत्या फाडू नये, असे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या महिन्यात काढले होते. त्यामुळे वाहतूक शाखेकडून नो-पार्किंग, तसेच सिग्नल तोडणे अशा विविध वाहतूक नियम ताेडणाऱ्यांवर रस्त्यात केली जाणारी दंडात्मक कारवाई थांबली. त्याचा गैरफायदा प्रामुख्याने कारचालक घेऊ लागले आहेत. त्यामुळे अनेकदा डबल पार्किंग झाल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

वाहतूक पोलिसांकडील दंडात्मक कारवाई बंद केल्याने जून महिन्यात तब्बल ५ कोटी रुपयांचा दंड कमी झाला. वाहतूक पोलिसांचे अधिकार कमी केल्याने वाहनचालक काहीसे बिनधास्त झाले आहेत. याबाबत एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी सायकलवर डबल सीट जाताना चौकात सायकल चालविणारा मागे बसलेल्याला उतरवून पुढे चालत जा, असे सांगत होता. कारण चौकातील पोलीस डबल सीट दिसला तर दंड करणार नाही. पण, सायकलची हवा सोडेल. कान पिरगाळेल, अशी भीती होती. आता तरुणांना भीती राहिली नाही. बिनधास्तपणे ट्रिपलसीट जातात. अशांवर काहीतरी धाक हवा.

जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, कॅम्पमधील महात्मा गांधी रोड येथे वाहनांची नेहमीच गर्दी असते. या रस्त्यांवर मोटारीच्या पार्किंगची सोय आहे. तरीही मोटारींचे डबल पार्किंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीच्या मानाने माेटारींमुळे वाहतूककोंडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहतूक पोलिसांकडील मशीन काढून घेतल्याने अशा वाहनचालकांचे मालक शोधणे पोलिसांना अवघड झाले आहे. पूर्वी अशा गाड्या वाहतूक पोलीस तातडीने टोईंग करुन उचलून नेत किंवा जॅमरची कारवाई केली जात असे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर धाक असायला हवा, असे नागरिकांचे मत आहे.

पोलिसांचा धाक गरजेचाच

वाहतूक पोलीस सध्या दंडात्मक कारवाई करत नसले, तरी बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचा धाक गरजेचा आहे. पुण्यात असंख्य लोक अत्यंत बेदरकारपणे वाहने चालवत असतात, त्यांच्यावर कारवाई होणे देखील गरजेचे आहे. एक-दोनदा समज दिल्यानंतर तिसऱ्यांदा त्यांच्यावर कडक कारवाई झाली तर पुढे असे वाहनचालक शिस्तीने वाहन चालवतील. - योगेश खाडे

दंड नकोच..

सगळेच वाहनचालक मुद्दाम वाहतुकीचे नियम तोडत नाहीत. अनेकदा अत्यावश्यक कारणास्तव नियमांचे उल्लंघन होते. अनेकदा दंडाएवढे पैसे देखील अनेक वाहनचालकांच्या खिशात नसतात, त्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. मुद्दाम नियम मोडणाऱ्यांवर देखील दंड न आकारता गांधीगिरी करत देखील पोलीस शिस्त लावू शकतात.- आशिष पुजारी

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीMONEYपैसा